शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

पंतप्रधान मोदींचा १० वर्षांचा कार्यकाळ ईशान्य भारतासाठी ‘सुवर्णकाळ’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 6:10 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे.

शिलाँग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा १० वर्षांचा कार्यकाळ हा ईशान्य भारतातील राज्यांसाठी सुवर्णकाळ आहे. या कालावधीत या राज्यांमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी व संघर्ष मिटविण्यासाठी योग्य तोडगा काढण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

नॉर्थ इस्टर्न कौन्सिलच्या (एनइसी) ७१व्या अधिवेशनात ते म्हणाले की, वारंवार होणारे रास्ता रोको, बंद, धुमसत असणारा असंतोष हे राज्यांतील चित्र आता इतिहासजमा झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळे केवळ ईशान्य भारत व दिल्ली तसेच देशातील अन्य भागांतले अंतर केवळ कमी झाले नाही तर लोकांमधील मतभेदही कमी झाले. 

ईशान्य भारतात हिंसाचाराच्या घटना घटल्याकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ईशान्येकडील राज्ये हा भारताचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, असे मोदी सरकारचे मत आहे. २००४ ते २०१४ या कालावधीत ११,१२१ हिंसक घटना ईशान्य भारतात घडल्या. २०१४ ते २०२३मध्ये या घटनांची संख्या ३,११४ होती. म्हणजे हिंसक घटनांत ७३ टक्क्यांनी घट झाली. या राज्यांत विविध घटनांत लष्करी जवान शहीद होण्याचे प्रमाणही ७१ टक्क्यांनी तर हिंसाचारात नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ८६ टक्क्यांनी घटले.

घुसखोरीचे प्रमाणही झाले कमीअमित शाह म्हणाले की, ईशान्य भारतातील राज्यांमध्ये घुसखोरी होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. गेल्या पाच वर्षांत दहशतवादी संघटनांचे ८,९०० सदस्य शरण आले असून मुख्य प्रवाहात सामील झाले. शांतता व समृद्धी एकत्र नांदते हा संदेश त्यातून सर्व देशाला मिळाला आहे. 

टॅग्स :Amit Shahअमित शाह