शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; महाराष्ट्रातून केवळ एक नाव चर्चेत, मंत्रिपद नक्की?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 2:00 PM

आधी राज्यातून तीन नावं चर्चेत होती; आता त्यातली दोन नावं मागे पडली आहेत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच अपेक्षित आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून एकदाही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात ५३ सहकारी आहेत. यातील काही वरिष्ठ मंत्र्यांकडे दोन दोन मंत्रालयांची जबाबादारी आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. यानंतर मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ८१ वर जाईल. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात २८ जणांना संधी मिळेल.

पुढील वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होत आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. २०१४ पासून अपना दल उत्तर प्रदेशात भाजपचा मित्रपक्ष आहे. २०१४ मध्ये पटेल यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात आलं होतं. याशिवाय उत्तर प्रदेशचे खासदार असलेले वरुण गांधी आणि रिटा बहुगुणा जोशी यांनादेखील केंद्रीय कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांनादेखील मोदी मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांचं मंत्रिपद जवळपास निश्चित मानलं जात आहे. सिंधिया यांनी त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं गेल्या वर्षी मध्य प्रदेशात सत्तांतर झालं. काँग्रेस सरकार कोसळून पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली. त्यामुळे सिंधिया यांना मंत्रिपदाचं बक्षीस मिळू शकते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनादेखील केंद्रात मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर राणे यांना मंत्रिपद मिळू शकतं. राणे यांच्यासोबतच छत्रपती उदयनराजे भोसले आणि प्रीतम मुंडे यांच्या नावांचीदेखील चर्चा होती. मात्र आता राणेंचा अपवाद वगळता इतर नेत्यांची नावं मागे पडली आहेत.

रामविलास पासवान आणि सुरेश अंगाडी यांचं मंत्रिपदी असताना निधन झालं. याशिवाय शिवसेना आणि अकाली दलानं त्यांच्याकडे असलेल्या मंत्रिपदांचा राजीनामा दिला. त्यामुळे एकूण चार मंत्रिपदं रिक्त आहेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत असल्यानं या राज्यांना मंत्रिमंडळ विस्तारात विशेष महत्त्व दिलं जाऊ शकतं.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाcongressकाँग्रेस