शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

पंतप्रधान मोदी यांची घटिका आता भरत आली - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:26 IST

केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.

नवी दिल्ली  -  केंद्रातील सरकार बदलण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घटिका भरत आली असल्याचा दावा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसने जाहीर केलेली न्याय योजना पसंत पडल्याने युवक तसेच ज्येष्ठ नागरिकही लोकसभा निवडणुकांत आम्हालाच मतदान करत आहेत. देशातील गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी न्याय योजना अतिशय परिणामकारक ठरणार असल्याचे त्यांना मनोमन पटले आहे.देशातील सर्वात गरीब कुटुंबांना दरवर्षी ७२ हजार रुपयांचे किमान हमी उत्पन्न देण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षाने आपल्या न्याय योजनेच्या माध्यमातून दिले आहे. ‘अब होगा न्याय’, असे घोषवाक्य असलेली प्रचारमोहीम लोकसभा निवडणुकांत या पक्षाने गेल्या महिन्यापासून राबविली आहे.‘चौकीदार चोर है' विषयीभिंड : ‘चौकीदार चोर है' ही घोषणा मी किंवा काँग्रेसने तयार केलेली नाही. युवक, शेतकरी, मजूर यांनीच मोदी सरकारची खिल्ली उडविण्यासाठी ही घोषणा तयार केली आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. जाहीर सभेत त्यांनी चौकीदार चोर है या घोषणेचा उगम कसा झाला याचा किस्सा सांगितला. दोन कोटी रोजगार निर्माण करीन, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार अशी आश्वासने चौकीदाराने (नरेंद्र मोदी) दिल्याचा उल्लेख आपण छत्तीसगडमधील सभेत करताच श्रोत्यांपैकी दहा-पंधरा युवकांनी ‘चौर है' असा प्रतिसाद दिला. ते काय म्हणाले हे पहिल्यांदा नीट ऐकू न आल्याने आपण पुन्हा विचारले असता ते युवक जोरात म्हणाले की ‘चौकीदार चोर है'. त्यानंतर ही घोषणा जनमानसात पसरली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी