शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

“संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त, पण व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक”: PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 2:27 PM

PM Narendra Modi News: अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, ते जगालाही पटू लागले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

PM Narendra Modi News: आताची वेळ सर्वांच्या विकासाची आणि कल्याणाची आहे. जागतिक विकासाच्या आड येत असलेल्या संकटावर मात करून मानवकेंद्रित विचारसरणीने आपल्याला पुढे जायचे आहे. जगाकडे एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक आत्मा या दृष्टीकोनातून पाहावे. भारताला अनेक दशकांपासून सीमेपलीकडील दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. दहशतवाद्यांनी हजारो निष्पाप लोकांची हत्या केली आहे. आमच्या संसदेलाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी संसदेचे अधिवेशन सुरू होते. दहशतवादी खासदारांना ओलीस घेऊन त्यांचा खात्मा करण्याच्या तयारीत होते. अशा अनेक दहशतवादी घटनांना तोंड देत भारत इथपर्यंत पोहोचला आहे. संपूर्ण जग दहशतवादामुळे त्रस्त आहे. मात्र, दहशतवादाच्या परिभाषेबाबत एकमत होत नाही हे दुःखद आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

नवी दिल्लीत आयोजित जी-२० संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. हे संमेलन एक प्रकारे जगभरातील संसदीय प्रक्रियांचे महाकुंभ आहे. शांतता, बंधुभाव जोपासण्याचा काळ असून, सर्वांनी एकत्रितपणे पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

दहशतवाद हे मोठे आव्हान, याची जगालाही जाणीव

दहशतवाद हे किती मोठे आव्हान आहे, हे आता जगालाही पटू लागले आहे. जगभरात कुठेही दहशतवाद घडो, त्याचे कारण, स्वरुप काहीही असो, तो मानवतेच्या विरोधातच असतो. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी दहशतवादाबाबत सातत्याने कठोर राहावे. दहशतवादाच्या व्याख्येवर एकमत होत नाही हे अत्यंत खेदजनक आहे. दहशतवादासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिवेशनांमध्ये एकमत व्हायला हवे. दहशतवादाविरुद्धच्या या लढ्यात आपण एकत्र कसे काम करू शकतो, याचा विचार जगभरातील संसद आणि प्रतिनिधींना करावा लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, भारताची संसदीय प्रक्रिया काळानुरूप सुधारली आहे. दहशतवादाविरुद्ध भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही सुद्धा भारतात आहे. हे चर्चेसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. तसेच, भारतातील सार्वत्रिक निवडणुका एखाद्या सणासारख्या असतात. स्वातंत्र्यानंतर भारतात १७ सार्वत्रिक निवडणुका आणि ३०० हून अधिक विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNew Delhiनवी दिल्ली