शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

PM Modi Mann Ki Baat: भारतात तयार झालेल्या वस्तूंना जगभरात मागणी, निर्यातीतही ऐतिहासिक वाढ; पंतप्रधानांनी सांगितली 'मन की बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 1:17 PM

भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narndra Modi) यांनी रविवारी मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. पाचा राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांनी या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. "भारतानं ४०० अब्ज डॉलर्सचं निर्यातीचं ध्येय गाठलं आहे. हे भारताच्या क्षमतेला दर्शवतं. याचाच अर्थ जगभरात भारतीय वस्तूंची मागणी वाढत आहे," असं ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जाणार असल्याचंही सांगितलं. "आज संपूर्ण जगात योग आणि आयुर्वेदाप्रती कल वाढत आहे. गेल्या आठवड्यात कतारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका योग कार्यक्रमात ११४ देशांच्या नागरिकांनी भाग घेत एक जागतिक विक्रम स्थापन केला. आयुष उद्योगाची बाजारपेठ सतत विस्तारत आहे. सहा वर्षांपूर्वी आयुर्वेदाशी संबंधित औषधांची बाजारपेठ २२ हजार कोटींच्या आसपास होती. आज आयुष उत्पादन उद्योग सुमारे एक लाख ४० हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे," असंही ते म्हणाले."अमृत सरोबत बांधले जाऊ शकतात"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ अमृत सरोवर बांधले जाऊ शकतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. काही जुन्या तलावांमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, काही नवीन बांधले जाऊ शकतात. या दिशेने तुम्ही नक्कीच काही प्रयत्न कराल याची मला खात्री आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

जलसंधारणावर भरआपल्या संबोधनादरम्यान पंतप्रधान मोदींनी जलसंधारणावर भर दिला. "मी अशा राज्यातून आलो आहे जिथे नेहमीच पाण्याची टंचाई असते. गुजरातमध्ये या विहिरींना (Stepwells) वाव म्हणतात. गुजरातसारख्या राज्यात वावने मोठी भूमिका बजावली आहे. या विहिरी संरक्षणासाठी 'जल मंदिर योजने'ने मोठी भूमिका बजावली आहे. संपूर्ण गुजरातमध्ये अनेक विहिरंचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यामुळे या भागातील पाणीपातळी वाढण्यासही मोठी मदत झाली. तुम्ही स्थानिक पातळीवरही अशाच प्रकारच्या मोहिमा चालवू शकता. देशातील अनेकांनी जलसंधारण हाच जीवनाचा एकमेव उद्देश बनवला आहे, याचा मला आनंद आहे," असंही मोदी म्हणाले.

निर्यात ४०० अब्ज डॉलर्सवरएकेकाळी भारतातून निर्यातीचा आकडा १०० अब्ज, कधी १५० अब्ज होता, आज भारत ४०० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतात तयार उत्पादनांची मागणी जगभरात वाढत आहे असा याचा अर्थ आहे. दुसरे म्हणजे भारताची पुरवठा साखळी दिवसेंदिवस मजबूत होत आहे. पूर्वी असं मानलं जात होतं की केवळ मोठे लोकच सरकारला उत्पादनं विकू शकतात, परंतु सरकारी ई-मार्केटप्लेस पोर्टलनं हे चित्र बदलले आहे. त्यातून नव्या भारताची भावना दिसून येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.बाबा शिवानंद यांचा उल्लेखकार्यक्रमात मोदींनी बाबा शिवानंद यांचा उल्लेख केला. नुकत्याच पार पडलेल्या पद्म पुरस्कार सोहळ्यात तुम्ही बाबा शिवानंद यांना पाहिलं असेल, असं मोदी म्हणाले. १२६ वर्षे वय असतानाही त्यांची चपळता पाहून माझ्या प्रमाणेच सर्वांनाच आश्चर्य वाटले असेल आणि काही सेकंदातच ते नंदीमुद्रेत प्रणाम करू लागले. मी पण बाबा शिवानंदजींना नतमस्तक झालो, असंही मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत