शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

Sri Aurobindo Anniversary : 'भारत अति प्रतिकूल परिस्थितीत थोडा कोमेजू शकतो, पण...'; वाचा - काय म्हणाले पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:11 AM

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबरला भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (13 डिसेंबर) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्री अरबिंदो यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त एक स्मारक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले. यावेळी, 'भारताला कुणीही नष्ट करू शकत नाही. भारताला कुणीही दाबू शकत नाही. भारत कधीही नष्ट होऊ शकत नाही,' असे मोदी म्हणाले.

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये 9 डिसेंबरला भारतीय जवान आणि चिनी सैनिक यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. अशा या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे विधान आले आहे. 

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत एक असे अमर बीज आहे, जे अति प्रतिकूल परिस्थितीत थोडे फार दाबू शकते, थोडे फार कोमेजून जाऊ शकते, परंतू ते नष्ट होऊ शकत नाही. कारण भारत हा मानवी सभ्यतेचा सर्वात परिष्कृत विचार आहे, मानवतेचा सर्वात स्वाभाविक आवाज आहे.'

मोदी म्हणाले, “श्री अरबिंदो यांचे जीवन आणि त्यांचा जन्म, हे एक "एक भारत, श्रेष्ठ भारत"चे प्रतिबिंब आहे. त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला असला तरी, त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गुजरात आणि पुद्दुचेरीमध्ये घालविले. ते जिथे-जिथे गेले तिथे-तिथे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची खोलवर छाप सोडली. स्वातंत्र्याच्या अमृतकाळासाठी ही एक मोठी प्रेरणा आहे.''

याच बरोबर मोदी म्हणाले, श्री अरबिंदो यांना हिंदी, मराठी, बंगाली आणि संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान होते. आज भारत अनेक गोष्टींचा साक्षीदार आहे. एवढेच नाही, तर भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे," असेही मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा