शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'खून रंग लाया है, तानाशाही हार गयी...'; मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, अशा येतायत सोशल मीडिया रिअ‍ॅक्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 15:31 IST

गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले आहेत. दिल्लीच्या विविध सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. काही जण या निर्णयाला निवडणुकीशी जोडून पाहत आहेत, तर काही जण याला मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत. (PM Narendra Modi repeal Farm laws)

गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. अनेक जण भाजपच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. एका युझरने ट्विट केले, की "खून रंग लाया है, तानाशाही हार गयी.....ऑंदोलन जीत गया. 

तसेच एका युझरने ट्विट केले आहे, की "भारतातील शेतकऱ्यांसोबत मोदी सरकार कसे वागले, कधीही विसरणार नाही." याच बरोबर, एका ने एक फोटो पोस्ट केला आहे, त्यावर एक शेतकरी व्यक्ती दाखवत आता आम्ही जिंकलो, असे लिहिलेले आहे.

एका युझरने ट्विट केले आहे, "अभिमान कितीही असो तो तुटतो नक्की. हा न्यायाचा विजय आहे. हा जनतेचा विजय आहे. हा निरंकुश व्यवस्थेविरुद्ध एकत्र आलेल्या शेतकऱ्यांचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे.

मात्र, अनेक लोक या तिनही कृषी कायदे मागे घेण्याचा विरोध करत आहेत. एका ट्विटर युझरने लिहिले आहे की, कृषी कायदे मागे घेणे, हा केवळ एक वाईट निर्णयच नाही ,रत लज्जास्पदही आहे. देशातील छोट्या आणि गरीब शेतकऱ्यांसाठी आज काळा दिवस आहे. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीSocial Mediaसोशल मीडियाFarmers Protestशेतकरी आंदोलन