शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

PM Narendra Modi : कामगारांनी स्थलांतर करू नये, शेतकरी अन् कामगारांचं होईल लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 21:11 IST

PM Narendra Modi :कोरोनाविरुद्ध देश पुन्हा एकदा मोठी लढाई लढत आहे. दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना होत असलेले दुःख मला समजू शकते. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

ठळक मुद्देकोरोनाविरुद्ध देश पुन्हा एकदा मोठी लढाई लढत आहे. दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना होत असलेले दुःख मला समजू शकते. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. यात सर्व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सहभागी झाले होते. त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधत कोरोनाच्या परिस्थितीचं कथन केलं. 

कोरोनाविरोधातील लढाईत पुढील तीन आठवडे अत्यंत निर्णायक असतील, तसेच यादरम्यान प्रत्येकालाच अत्यंत सावध रहावे लागेल, असे केंद्रीय पथकाचे डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले आहे. (The next three weeks are crucial, all states should be vigilant says Central Government government ). तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या भाषणात कोरोनाबद्दलची परिस्थिती सांगत देशाने जगभरातील लसीकरणामध्ये स्वत:ला सिद्ध केल्यचाचं मोदींनी सांगितलं. 

कोरोनाविरुद्ध देश पुन्हा एकदा मोठी लढाई लढत आहे. दुसऱ्या लाटेमुळे नागरिकांना होत असलेले दुःख मला समजू शकते. कोरोनामुळे प्राण गमावलेल्या नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. कितीही कठीण परिस्थिती आली, तरी धैर्य, संयम गमावता कामा नये, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केलंय. तसेच, देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स चालक, पोलीस कर्मचारी या कोरोना योद्धांचे कौतुक केले. तसेच, कोरोनाच्या लढाईला धैर्याने तोंड दिले, तरच आपण त्यात विजय मिळवू शकतो, असेही मोदी म्हणाले. 

देशातील प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा, लसीकरणासाठीही आपण महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता 1 मे पासून 18 वर्षांपासूनच्या सर्व नागरिकांना लस टोचण्यात येणार आहे. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात होत असून आपल्याला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. त्यामुळे, शेतकरी आणि कामगार वर्गाला लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. म्हणून, कामगारांनी आहे त्याच जागी राहावे, स्थलांतर करू नये, असे आवाहनही मोदींनी आपल्या भाषणात केलंय. 

राज्य सरकारला माझा आग्रह आहे की, कामगारांना विश्वासात घ्यायला हवा. कामगार सध्या ज्या शहरात आहेत, तेथेच राहावे, असे सांगण्यात यावे. कामगार आणि शेतकऱ्यांचं प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या, आपण कोरोना महामारीला लढा देतोय, पहिल्या लाटेवेळी आपल्याकडं अनेक साधनसामुग्रींचा अभाव होता. आता, परिस्थिती वेगळी आहे. जनतेच्या सहभागातूनच आपण कोरोनाला पराभूत करू शकतो, असे मोदींनी म्हटले. 

लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बैठक देशात कोरोनाचा कहर वाढत असतानाच, आज मंगळवारी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने लस तयार करणाऱ्या कंपन्यांशी बैठक घेतली. यापूर्वी सोमवारी त्यांनी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीतील प्रमुखांशी चर्चा केली होती. तसेच, पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत औषध क्षेत्राच्या महत्वपूर्ण भूमिकेचेही कौतुकही केले.

भारत बनला फार्मेसी ऑफ वर्ल्ड - मोदीमोदी म्हणाले, औषध उद्योगाच्या प्रयत्नांमुळेच, आज भारताला जगात फार्मेसी ऑफ वर्ल्ड म्हणून ओळखले जाते. आपण या महामारीच्या काळात जगातील 150 हून अधिक देशांना आवश्यक औषधी उपलब्ध करून दिली. 

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण -गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसChief Ministerमुख्यमंत्रीLabourकामगार