शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला", संविधानावर बोलताना नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 20:43 IST

PM Narendra Modi On 75th Year of Constitution : जगात लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या या कलंकावर चर्चा होईल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

PM Narendra Modi On 75th Year of Constitution : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि.१४) लोकसभेत संविधानावर आपले मत व्यक्त केले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर टीका केली. तसेच, काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

देश जेव्हा संविधानाचे २५ वर्षे पूर्ण करत होता, तेव्हा संविधान हिसकावून घेण्यात आली होते, देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. देशाचे तुरुंगात रूपांतर करण्यात आले होते. प्रेसला कुलूप लावण्यात आले होते. जगात लोकशाहीची चर्चा होईल तेव्हा काँग्रेसच्या या कलंकावर चर्चा होईल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.

मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही, काँग्रेसच्या एका घराण्याने संविधान दुखावण्याची कोणतीही कसर सोडली नाही. ५५ वर्षे एकाच परिवाराने राज्य केले, त्यामुळे देशात काय करायचे, याचा अधिकार देशाला आहे. या परिवाराने संविधानाला प्रत्येक स्तरावर आव्हान दिले आहे. जेव्हा देशाच्या संविधानाला ५० वर्षे पूर्ण होत असताना मलाही मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती. ज्यावेळी ६० वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी हत्तीवरून संविधानाची गौरव यात्रा काढण्यात आली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांना म्हटले की, संविधान आपल्या रस्त्यात आलं तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. तसेच काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. ६० वर्षात ७५ वेळा संविधान बदलण्यात आले, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

जी परंपरा नेहरूंनी सुरू केली आणि तीच इंदिरा गांधी यांनी पुढे नेली. १९७१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला. त्या निर्णयाला संविधान बदलले गेले. आणि १९७१ संविधान तरतूद केली गेली. त्यांनी देशाच्या न्यायालयाचे पंख कापून टाकले होते. संसद संविधानाच्या कोणत्याही कलममध्ये काहीही करू शकते आणि त्याकडे न्यायालय पाहूही शकत नाही, अशी ती तरतूद होती. न्यायालयाचे हे अधिकार काढून टाकले होते. हे पाप १९७१ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी केले होते, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

याचबरोबर, राजीव गांधींनी संविधानाला आणखी एक गंभीर धक्का दिला. त्यामुळे समानतेच्या भावनेला धक्का बसला. तसेच, भारतातील महिलांना न्याय देण्याचे काम संविधानाच्या मर्यादेच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, पण व्होट बँकेसाठी राजीव गांधींनी संविधानाच्या भावनेचा त्याग करून कट्टरपंथीयांसमोर नतमस्तक झाले होते, असे म्हणत नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू