शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निलंबनाने पंतप्रधान नाराज, मोदींनी फटकारल्यानंतर निलंबन रद्द करण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 09:28 IST

विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचे संसदेतून निलंबन करण्यात आल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जाते.

संजय शर्मा

नवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या १४ खासदारांचे संसदेतून निलंबन करण्यात आल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सांगितले जाते. पंतप्रधानांची नाराजी पाहून खासदारांच्या निलंबन वापसीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे लोकसभेच्या १३ व राज्यसभेच्या एका खासदाराला संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले होते. या मुद्द्यावर विरोधकांचा गदारोळ व निदर्शनांमुळे आजही संसदेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे अंतिम अधिवेशन असेल. यानंतर फेब्रुवारीमध्ये लेखानुदानासाठी औपचारिकरीत्या अधिवेशन बोलावले जाईल. परंतु, ते पूर्ण अधिवेशन समजले जात नाही.

साेमवारी ताेडगा?

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाने नाराज आहेत. पंतप्रधानांनी गुरूवारी सकाळी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सरकारच्या रणनीतीकारांना सांगितले होते की, या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये.

कोणत्याही त्रुटी असतील तर त्या कमी करण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या या निर्देशानंतरही १४ खासदारांच्या निलंबनाने राजकीय रंग घेतला आहे. पंतप्रधानांनी फटकारल्यानंतर आता सरकारचे रणनीतीकार निलंबन परत घेण्याबाबतचा मार्ग शोधत आहेत.

विरोधी पक्षांच्या नेत्यांशी आता मागील दाराने चर्चा सुरू आहे. सूत्रांनी सांगितले की, येत्या सोमवारी या मुद्द्याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.

सुरक्षेत त्रुटी कशा राहिल्या?

आदेश रावल

नवी दिल्ली : दोन दिवसांपासून संसदेतील गोंधळ कायम आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी १३ डिसेंबरच्या घटनेवर सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, सरकारकडून सभागृहात कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. गृहमंत्री शाह सभागृहात येऊन संपूर्ण घटनेवर निवेदन करत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू शकणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

संपूर्ण विरोधी गट ‘इंडिया’ची एकच मागणी आहे की, सुरक्षेत त्रुटी कशा राहिल्या, हे सरकारने सभागृहाला सांगावे. प्रत्यक्षात या घटनेपासून आतापर्यंत दिल्ली पोलिसांनीही मौन बाळगले आहे.

एका मिनिटात संसद पडली ठप्प

विरोधी सदस्यांनी सतत गदारोळ केल्यामुळे शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभेत एका मिनिटांत कामकाज ठप्प पडले. यामुळे गुन्हेगारी कायद्यांची जागा घेणारी तीन विधेयके रखडली.

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसद