शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

गोरक्षकांबाबत पंतप्रधानांना उशिरा जाग आली- राहुल गांधी

By admin | Published: June 29, 2017 11:37 PM

गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्यानंतर आता राहुल गांधींनी मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 29 - गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केल्यानंतर आता राहुल गांधींनी मोदींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. मोदींनी गोरक्षकांना दिलेला संदेश हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात बैरिया गावात बुधवारी गोरक्षकांच्या बेदम मारहाणीत एक जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच पंतप्रधानांनी गोरक्षकांबाबत केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालंय. उस्मान अन्सारी नामक व्यक्तीच्या घराजवळ गाय मृतावस्थेत आढळल्यानंतर जवळपास 100 जणांच्या एका टोळक्यानं घरात घुसून अन्सारी यांना मारहाण करत घर पेटवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे. साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना मोदींनी हे वक्तव्य केलं होतं. गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असं मोदी बोलले आहेत. आपण अहिंसेची शिकवण मिळालेल्या देशात आहोत. महात्मा गांधींच्या देशात आहोत, याचा का म्हणून विसर पडतो ? अशी खंतही मोदींनी यावेळी व्यक्त केली होती. तर मोदींच्या भूमिकेला विरोधकांनीही लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींनी नोंदवलेला निषेध फक्त शब्दांचा खेळ आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही अशी टीका एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, ममता बॅनर्जी यांनी केली होती. मोदींनी फक्त शब्दांचा खेळ केला. ते जे बोलले तसे त्यांनी करून दाखवावे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फरक आहे, असं म्हणत असदुद्दीन ओवैसींनी मोदींवर निशाणा साधला होता.

मोदी या मुद्द्यावर दोनदा बोलले तरीही त्याचा काही परिणाम झाला नाही. गेल्या वर्षी दादरीमध्ये घरात बीफ ठेवल्याच्या संशयावरून मोहम्मद अखलाखची जमावाने हत्या केल्यानंतर मोदी या विषयावर बोलले होते. त्यावेळीही त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. गोरक्षकांना भाजपा आणि संघाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतो, असे ट्विट ओवैसींनी केले होते. पहलू खानची हत्या करणा-या तिघांना अजून का अटक झालेली नाही ? याचे कारण राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता आहे, असे ट्विट ओवैसींनी केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विट करून गोरक्षेच्या नावाखाली झालेल्या हत्येचा निषेध नोंदवला आहे.