शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

वकिलांवर पोलिसांची कारवाई योग्यच

By admin | Published: February 26, 2016 3:48 AM

पटियाला हाऊस कोर्टात पत्रकार, विद्यार्थी आणि कन्हैयाला मारहाण करण्याची घटना दुर्देवीच आहे. सरकारने आधीच त्याची निंदा केली आहे. मारहाण करणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी

- विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीपटियाला हाऊस कोर्टात पत्रकार, विद्यार्थी आणि कन्हैयाला मारहाण करण्याची घटना दुर्देवीच आहे. सरकारने आधीच त्याची निंदा केली आहे. मारहाण करणाऱ्या वकिलांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्य व न्याय्य आहे. भारतीय दंड विधान व दंड संहितेनुसार त्यांच्या विरोधात जी कलमे पोलिसांनी लावली, ती योग्य की अयोग्य याचा निर्णय न्यायालयात होईल, असे उत्तर गृहमंत्री राजनाथ सिंगांनी राज्यसभेत दिले.दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यावर काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेचे उत्तर देतांना गृहमंत्री बोलत होते. गृहमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत काँग्रेस सदस्यांनी सरकारचा निषेध करीत सभात्याग केला.मारहाण प्रकरणातील ३ वकील व भाजपचे आमदार ओ.पी.शर्मा यांच्याविरोधात विविध कलमांखाली दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, असे नमूद करून गृहमंत्री म्हणाले, मारहाणप्रकरणी नेमक्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, हा अधिकार दिल्ली पोलीसांचा आहे. सदर प्रकरणाचा तपास अद्याप संपलेला नाही. कदाचित आणखी काही वकिलांच्या विरोधातही पोलीस कारवाई करू शकतात. आझाद, त्यागी व या विषयावर आपली भूमिका मांडणाऱ्या अन्य वक्त्यांच्या आक्षेपांना उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, दिल्ली देशाची राजधानी असल्यामुळे दिल्ली पोलिसांना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतात. तरीही सदर प्रकरणात अत्यंत प्रभावीरित्या दिल्ली पोलिसांनी आपली जबाबदारी हाताळली आहे. सर्वच प्रसंगात सर्वार्थाने निर्दोष पध्दतीने पोलीस कामकाज करतात असा दावा करता येत नाही. प्रत्येक वेळी थोड्या फार सुधारणांची त्यात गरज असतेच. एनडीए सरकार सत्तेवर आल्यापासून सरकारने पोलीस दलाला प्रत्येक लहान मोठ्या गुन्ह्णांचे एफआयआर नोंदवण्याची सक्ती केली आहे. याधोरणामुळे दिल्लीत गुन्ह्णांची संख्या वाढलेली दिसते. याचा अर्थ राजधानीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे, हा आरोप खरा नाही.गृहमंत्र्यांच्या उत्तरावर विरोधी पक्षाचे सर्वच सदस्य प्रक्षुब्ध होते. सभागृहात संतापाचे वातावरण होते. त्यामुळेच गृहमंत्र्यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत विरोधकांनीही सभात्याग केला.गृहमंत्र्यांच्या उत्तरावर जोरदार आक्षेप नोंदवत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले, मारहाण करणारे वकील व दिल्ली पोलीस यांचे संगनमत झाले होते, असा मुख्य आरोप आहे.ज्यांना मारहाण झाली, त्यांना पोलिसांकडून या प्रकरणात न्याय मिळण्याची खात्री वाटत नाही. बनावट चित्रफितींच्या आधारे कन्हैयावर जे पोलीस देशद्रोहाचा खटला भरतात, त्याच पोलिसांनी मारहाण करणाऱ्या वकिलांचा पर्दाफाश करणाऱ्या खऱ्या चित्रफिती उपलब्ध असतांना, किरकोळ कलमे लावून त्यांना लगेच जामिनावर मुक्त केले. अशा पक्षपाती पोलीस यंत्रणेची बाजू घेउन गृहमंत्री उत्तर देत आहेत. ते आम्हाला कदापि मान्य नाही. जद (यु)चे के.सी.त्यागी यांनी दिल्लीचे पोलीस साध्या वेषात जेएनयूमधे विद्यार्थीनींच्या वसतिगृहात राजरोसपणे घुसतात, त्यांना धमक्या देतात, या घटनेचे गृहमंत्री समर्थन करणार आहेत काय, असा सवाल केला.