शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

केजरीवाल, आतिशी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार, योजनांसाठी बनावट नोंदणी केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 20:42 IST

या महिलेने अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' संदर्भात फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अलीकडच्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीच्या आप सरकारने अनेक योजनांच्या घोषणा केल्या आहेत. यामधील 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' याबाबत बदरपूर येथील एका महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. 

या महिलेने अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' संदर्भात फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. महिलेने ही योजना बनावट असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी दक्षिण दिल्लीतील भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी सांगितले की, योजनांच्या नोंदणीबाबत अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. केजरीवाल हे केवळ 'मुख्यमंत्री महिला सन्मान योजना' आणि 'संजीवनी योजना' घेऊन जनतेची फसवणूक करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या दोन्ही योजना जनतेची फसवणूक करण्याच्या सुनियोजित कटाचा भाग म्हणून करण्यात आल्या आहेत, असा आरोप रामवीर सिंह बिधुरी यांनी केला.

रामवीर सिंह बिधुरी म्हणाले की, या योजना दिल्ली सरकारने अधिसूचित केल्या नाहीत. त्यामुळे घोषणेच्या वेळी मुख्यमंत्री अतिशी उपस्थित होत्या. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली. मंत्रिमंडळाने महिलांना देण्यात येणारी रक्कम 1,000 रुपये मंजूर केली. मात्र, याचा प्रचार 2,100 रुपयांची योजना म्हणून केला. तसेच संजीवनी योजनेचीही घोषणा केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.

पुढे रामवीर सिंह बिधुरी म्हणाले, एवढेच नाही तर या योजनांसाठी बनावट नोंदणी केली जात आहे. बनावट कार्ड दिले जात आहेत. नोंदणी किंवा कार्डचा कोणताही कायदेशीर अर्थ नाही. निष्पाप जनतेची फसवणूक करण्यासाठीच हे करण्यात आले आहे. या दोन्ही योजना बनावट असल्याची माहिती खुद्द दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी जनतेला दिली आहे.

काही महिलांनी बदरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीदोन्ही योजना बनावट असल्यामुळेच आता काही महिलांनी बदरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे रामवीर सिंह बिधुरी यांनी सांगितले. तसेच, दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेली सार्वजनिक माहिती, बनावट कार्ड आणि केजरीवाल आणि मुख्यमंत्री आतिशी यांचा सहभाग पूर्णपणे सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असेही रामवीर सिंह बिधुरी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीAAPआपAtishiआतिशी