शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी विहीर केली कोरडी

By admin | Published: April 21, 2017 6:28 PM

एका मुलीच्या हत्येचा तपास करत असताना पुराव्यासाठी पोलीस 50 मीटर खोल विहीरीत उतरले होते

ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 21 - एखाद्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी ठरवलं तर काहीही करु शकतात याचा प्रत्यय क्राईम ब्रांचने आणून दिला आहे. राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात तपास करत असताना क्राईम ब्रांनचे याचं उदाहरण दिलं आहे. एका मुलीच्या हत्येचा तपास करत असताना पुराव्यासाठी पोलीस 50 मीटर खोल विहीरीत उतरले होते. या विहीरीत उतरण्यासाठी त्यांना 17 तास विहीरीच्या बाहेर उभं राहून वाट पहावी लागली. कारण पंपच्या सहाय्याने विहीरीतील सगळं पाणी बाहेर काढून विहीर कोरडी करण्यात आली. पोलीस एका मोबाईलचा शोध घेत होते जो या विहीरीत फेकून देण्यात आला होता. या मोबाईलच्या शोधासाठी पोलिसांना खूपच धावपळ करावी लागली. 
 
पोलीस अधिका-याने सांगितलं की, "16 एप्रिल रोजी आम्हाला भिलवाडा - कोटा राष्ट्रीय महामार्गावर बासाखेडा येथे एका तरुणीचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती. ही हत्या 14 एप्रिलला झाली होती, पण आम्हाला 16 एप्रिलला याची माहिती मिळाली. तपास केला असता ही 20 वर्षीय तरुणी 14 एप्रिलपासून बेपत्ता असून रायला पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल होती".
 
"आम्ही कपडे आणि अंगठीच्या सहाय्याने मृतदेहाची ओळख पटवली. 14 एप्रिलला बेपत्ता झालेली तरुणी हिच असल्याची आमची खात्री पटली. हत्या करणा-याने तिचा चेहरा ठेचला असल्याने तिला ओळखणं कठीण झालं होतं", असंही अधिका-याने सांगितलं आहे.
 
तपासादरम्यान तरुणी उत्तरप्रदेशची राहणारी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगितलं की "ती एक शिक्षिका होती. रायलामधील एका शिक्षकासोबत तिचे संबंध होते. तिच्या कुटुंबियांनी तिचं लग्न ठरवलं होतं. 6 मे रोजी तिचं लग्न होणार होतं. दुसरीकडे तरुणी आपल्या प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकत होती. प्रियकर आधीच विवाहित आणि एका मुलाचा बाप होता. दोघांमध्ये भांडण झालं असता त्याने कानाखाली मारली. नंतर धक्का मारला असता ती बेशुद्ध झाली. याचा फायदा घेत त्याने दगडाने तिच्यावर हल्ला करत हत्या केली". 
 
आरोपीने बाईकवरुन आपलं गाव गाठलं. जाताना सोबत तरुणीची बॅग आणि फोनही घेऊन गेला. त्याने बॅग रस्त्यात टाकली आणि मोबाईल विहीरीत फेकून दिला. पोलिसांनी 17 एप्रिल रोजी आरोपीला अटक केली असता त्याने सगळ्या घटनेचा उलगडा केला.