शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

काय सांगता? बॉयफ्रेंडसोबत पळून गेली विधवा; पोलिसांनी शोधून काढलं अन् केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 16:02 IST

जेव्हा मुस्कानचे सूरजसोबतचे प्रेमसंबंध घरच्यांना कळले तेव्हा दोन्ही कुटुंबातील लोकांनी हे नातं मान्य केलं नाही.

बिहारच्या ब्रह्मपूर येथे पोलिसांनी विधवा महिलेचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिल्याची अनोखी घटना समोर आली आहे. या अनोख्या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. ब्रह्मपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रक्षा नगर गावातील विधवा महिला मुस्कान पतीच्या निधनानंतर आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीसह एकटीच जीवन जगत होती.

मुस्कानची ओळख याच दरम्यान ब्रह्मपूर गावातील स्थानिक रहिवासी देव कुमार साह यांचा मुलगा सूरज कुमार साह याच्याशी झाली. गेल्या सहा महिन्यांपासून दोघांमधील प्रेमसंबंध वाढतच गेले आणि दोघेही फोनवर एकमेकांशी बोलू लागले. मात्र घरातील सदस्यांना हे नातं मान्य नसल्याने दोघंही घरातून पळून गेले.

जेव्हा मुस्कानचे सूरजसोबतचे प्रेमसंबंध घरच्यांना कळले तेव्हा दोन्ही कुटुंबातील लोकांनी हे नातं मान्य केलं नाही. यानंतर विधवा महिलेसह तिचा प्रियकर सूरज घरातून पळून झारखंडमधील जमशेदपूर येथे गेला. त्याचवेळी कुटुंबीयांनी दोघेही बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांना ते दोघेही सापडले. 

दोघांची चौकशी सुरू केली असता हे प्रेम प्रकरण निघाले. दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचवेळी ब्रह्मपूर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष बैजनाथ चौधरी यांनी दोघांच्याही कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. जिथे पोलिसांनी दोन्ही पक्षांना लग्नासाठी तयार केलं. यानंतर दोघांनी प्रसिद्ध बाबा ब्रह्मेश्वरनाथ मंदिरात लग्न केलं.

या विवाहात स्थानिक पोलीस, लोकप्रतिनिधी आणि मंदिर समितीच्या लोकांनी पाहुणे बनून सर्व विधी पार पाडल्या. तसेच पोलीस स्टेशन अध्यक्ष बैजनाथ चौधरी यांच्या वतीने मंदिरात उपस्थित सर्व लोकांना मिठाई वाटण्यात आली आणि त्यानंतर नववधू मुस्कानला तिच्या नवीन घरी पाठवण्यात आलं. पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.