शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

राजकीय पक्षांना आरटीआय नको

By admin | Published: August 25, 2015 4:00 AM

राजकीय पक्षांना माहितीचा अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणता येणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी मांडली. राजकीय पक्षांना

नवी दिल्ली : राजकीय पक्षांना माहितीचा अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणता येणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी मांडली. राजकीय पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण मानून या कायद्यांतर्गत आणल्यास त्यांच्या सुरळीत चालणाऱ्या कार्यावर विपरीत परिणाम होईल. राजकीय पक्षांना वाईट हेतूने माहिती मागण्यासाठी याचिका दाखल करण्याची संधीच मिळेल, असा युक्तिवादही सरकारने केला.आरटीआय कायदा लागू करण्यात आला तेव्हा राजकीय पक्षांना पारदर्शकता कायद्यांतर्गत आणण्याचा दृष्टिकोन नव्हता. लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ आणि आयकर कायद्यानुसार राजकीय पक्षांच्या आर्थिक व्यवहाराबाबत पारदर्शकता आणली गेली आहे, असे कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले. भाजप, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण मानून आरटीआयअंतर्गत आणले जावे, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने केंद्राला नोटीस पाठविली होती. उत्तरादाखल सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल करताना प्रतिकूल परिणामांकडे लक्ष वेधले. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुक्त व्याख्येमुळे चुकीचा निष्कर्षकेंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) आरटीआय कायद्याच्या कलम २(एच)ची अतिशय मुक्त व्याख्या केल्यामुळे राजकीय पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण मानण्याचा चुकीचा निष्कर्ष काढण्यात आला. आरटीआय कायदा लागू करताना राजकीय पक्षांना त्याच्या कक्षेत आणण्याचा दृष्टिकोन नव्हता. राजकीय पक्षांना सार्वजनिक प्राधिकरण मानले गेले तर त्यांच्या अंतर्गत कामकाजावर विपरीत परिणाम होईल, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.