शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

शिवराजसिंह आणि वसुंधराराजेंचं राजकीय पुनर्वसन, केंद्रीय मंत्रिमंडळात संधी? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:40 IST

या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करायचं असेल तर भाजपला त्यांना आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागणार आहे.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवला. निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसांच्या खलबतांनंतर भाजपने आपली सत्ता आलेल्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची नावे जाहीर केली आणि अनुभवी नेत्यांना दूर ठेवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. छत्तीसगडपाठोपाठ मध्य प्रदेश आणि राजस्थानातही भाजपने माजी मुख्यमंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानात वसुंधराराजे यांना मुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन कशा प्रकारे केलं जाणार, याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

शिवराजसिंह चौहान आणि वसुंधराराजे यांचं राजकीय पुनर्वसन करायचं असेल तर भाजपला त्यांना आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागणार आहे. कारण या दोन्हीही नेत्यांनी आपआपल्या राज्यात अनेक वर्ष मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्यामुळे राज्यातच दुय्यम स्थानावर काम करण्यासाठी हे दोन्हीही नेते उत्सुक असणार नाहीत. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

शिवराजसिंह चौहान यांना कोणतं खातं दिलं जाणार?

 तब्बल चार टर्म मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराजसिंह चौहान यांचा केंद्रातील मंत्रिमंडळात समावेश करण्याचा निर्णय घेतल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देऊ शकतात. सिंह यांना कृषी खातं दिलं जाऊ शकतं, अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. 

दोघांचं पुनर्वसन का गरजेचं?

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानात वसुंधराराजे यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्रिपद नाकारण्यात आल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले असण्याची शक्यता आहे. त्यातच लोकसभेच्या निवडणुकाही काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. परिणामी दोन्ही नेत्यांचे योग्य राजकीय पुनर्वसन न केल्यास त्यांच्या समर्थकांच्या नाराजीचा सामना भाजपला लोकसभा निवडणुकीत करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर शिवराजसिंह चौहान आणि वसुंधराराजेंबद्दल भाजपचं केंद्रीय नेतृत्व नक्की काय निर्णय घेतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान