शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

UPSC तील फसवणूक अन् निवड प्रक्रियेची चौकशी व्हावी; NITI आयोगाच्या माजी प्रमुखांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2024 15:28 IST

UPSC controversy: निती आयोगाचे माजी कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी UPSC च्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

UPSC controversy : महाराष्ट्र कॅडरच्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. पूजा यांच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे IAS पद मिळवल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, लवकरच सत्य समोर येईल. दरम्यान, आता NITI आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि G20 चे शेर्पा अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनी थेट UPSC च्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, याबाबत चौकशी करण्याची मागणीदेखील केली आहे.

कठोर कारवाई व्हावीNITI आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी देशातील सर्वात प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक असलेल्या UPSC नागरी सेवा परीक्षेतील फसवणूक प्रकरणाची चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी 'X' वर एका पोस्टमध्ये लिहिले की, "UPSC द्वारे घेण्यात येणार्या नागरी सेवांमध्ये फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी."

आरक्षणाचा गैरवापर होत आहेअमिताभ कांत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये निवड ही गुणवत्ता आणि प्रामाणिकपणावर आधारित असावी, यावर भर दिला. तसेच, एससी/एसटी आणि ओबीसी आरक्षणांना पाठिंबा दर्शवत शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंगांसाठी असलेल्या विद्यमान आरक्षणाचा आढावा घेण्याची आणि नागरी सेवांमध्ये तृतीय लिंगांसाठी प्रस्तावित 1% आरक्षणाची मागणीदेखील केली. ते म्हणाले, "प्रतिष्ठित परीक्षांमध्ये फायदा मिळवण्यासाठी आरक्षणांचा गैरवापर केला जातोय. SC/ST किंवा OBC आरक्षण चालू ठेवावे, सोबतच क्रिमी लेयरचे नियम लागू केले जावेत," अशी मागणीदेखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली.

पूजा खेडकर यांचे पद जाऊ शकतेमहाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) निवडीत फायदा मिळवण्यासाठी बनावट अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रमाणपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी यूपीएससीने पूजा यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेत एफआयआर दाखल केला आहे. यासोबतच तुमची उमेदवारी रद्द का करू नये आणि आगामी यूपीएससी परीक्षेत बसण्यापासून का रोखले जाऊ नये? अशी विचारणा नोटीसीतून केली आहे. 

निवड प्रक्रियेतील अनियमिततेवर UPSC ने काय म्हटले?यूपीएससीतील अनियमिततेच्या आरोपांवर आयोगाकडून निवेदन जारी करण्यात आले आहे. यूपीएससीने म्हटले की, आम्ही एक घटनात्मक संस्था आहोत आणि नियमांचे पालन करणे किंवा त्यांची अंमलबजावणी करणे, ही आमची जबाबदारी आहे. परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि काही अनियमितता आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. उमेदवारांचा आमच्यावर विश्वास आहे आणि हा विश्वास अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगNIti Ayogनिती आयोग