शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Pooja Yadav: पुजाने जिवाची बाजी लावून 5 जणांना वाचवलं, पण तिला वीरमरण आलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 9:14 AM

कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं, लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या.

लखनौ - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी बुधवारी रात्री 13 जणांचा विहिरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत 6 महिला व 7 मुलींचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली. घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी मदत कार्य केल्यानं काही महिलांना बाहेर काढण्यात यश आलं अन्यथा याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाची मुलगी असलेल्या पूजा यादव हिने जीवाची बाजी लावून 5 जणांना जीव वाचवला.

कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे ही घटना घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं, लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. काही विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या. मात्र, मोठ्या संख्येने असल्याने महिलांच्या जास्त वजनामुळे स्लॅब खाली कोसळला. त्यामुळे, विहिरीवर बसलेल्या सर्व महिला विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत 13 जणांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये, 21 वर्षीय पूजा यादवचाही समावेश आहे. या दुर्दैवी घटनेदरम्यान पूजाने दाखवलेल्या धाडसाचं मोठं कौतूक होत आहे. पुजाने 5 जणांचा जीव वाचवला, त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. सैन्यदलात भरती होण्यासाठी पूजा तयारी करत होती, मात्र काळाने असा भविष्यकाळ तिच्यासमोर ठेवला होता. 

पूजाचे वडिल बलवंत हे सैन्यदलात आहेत, आपल्या मुलीच्या लग्नासाठी ते चिंताग्रस्त होते. एकीकडे मुलगी सैन्य दलात भरती झाली नव्हती, तर दुसरीकडे तिचे लग्नही भरतीमुळे थांबले होते. मात्र, आता आपल्या लाडक्या लेकीला शेवटचा निरोप देण्याची वेळ दुर्दैवाने पित्यावर आली. या धाडसी पुजासाठी संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पूजासोबत तिची आईही विहिरीत बुडत होती. पुजाने एकापाठोपाठ एक असं करत, 5 जणांचा जीव वाचवला. सहाव्या महिलेला वाचवताना पूजा स्वत: पाण्यात बुडाली. 

मी सर्वांनाच वाचवणार अशी मनाची तयारी पुजाने केली होती, त्यासाठी ती विहिरीत उतरली होती. पुजाचा हा धाडसी बाणा पाहून रडणारे, धावा करणारे पीडित मदतीसाठी पुजाचेच नाव घेत होते. दरम्यान, पूजा ही तहसीलदार शाही महाविद्यालय सिन्हा येथे बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होती. त्यासोबतच तिचे दोन जुळे भाऊ आदित्य आणि उत्कर्ष हे होते. या दोन्ही भावांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला. हे दोघे भाऊ इयत्ता 9 वीत शिकत होते. पुजाचे वडिल सध्या दिल्लीत पोस्टींगवर आहेत. 

स्थानिकांनी दिली पोलिसांना माहिती

या घटनेची स्थानिकांनी तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना माहिती दिली. तसेच काही लोकांनी इतरांची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. परंतु महिलांची संख्या अधिक असल्याने काही स्थानिकांची तारांबळ उडाली. यात काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना ४ लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Armyभारतीय जवानDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश