शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

गरीब फासावर, धनाढ्य निर्धास्त

By admin | Published: July 21, 2015 10:13 AM

कायद्यासमोर श्रीमंत व गरीब असा कोणताही भेदभाव केला जात नाही असे नेहमीच सांगितले जाते. पण गेल्या १५ वर्षात फाशी झालेल्यांची आकडेवारी बघितली तर भीषण वास्तव समोर येते.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - कायद्यासमोर श्रीमंत  व गरीब असा कोणताही भेदभाव केला जात नाही असे नेहमीच सांगितले जाते. पण गेल्या १५ वर्षात मृत्यूदंड  आकडेवारी बघितली तर भीषण वास्तव समोर येते. यात श्रीमंताच्या तुलनेत गरीबांना जास्त कठोर शिक्षा दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या १५ वर्षात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या ३७३ गुन्हेगारांचा सखोल अभ्यास केला. यातील तीन चतुर्थांश गुन्हेगार हे मागासवर्गीय व अल्पसंख्यांक वर्गातील होते. तर ७५ टक्के गुन्हेगार ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. गरीब व मागासवर्गीय लोकांना कठोर शिक्षा होण्याची कारणं शोधली असता या गुन्हेगारांना स्वतःचा बचाव करण्यासाठी वकिलाची नेमणूकही करता येत नाही, आर्थिक विवंचनेमुळे त्यांना वकिल करणे कठीण होते. दुर्दैवाची बाब म्हणजे यातील बहुसंख्य गुन्हेगार हे सुनावणीसाठी कोर्टातही हजर राहत नाही. हजर राहिलो तरी न्यायालयात काय सुरु आहे हेच समजत नाही असे या गुन्हेगारांचे म्हणणे आहे. न्यायव्यवस्थेतील या परिस्थितीवर ख्यातनाम कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण म्हणाले, अजूनही बरेच कैदी असे असतात ज्यांची साधा जामीन मिऴवण्यासाठी वकिल करण्याची कुवत नाही. न्यायव्यवस्थेत श्रीमंतांपेक्षा गरींबांना जास्त कठोर शिक्षा होते या दाव्यात तथ्य आहे. लॉ कमिशन आता मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवावी की नाही यावर विचारमिनीमय करत आहे. या समितीचे अध्यक्ष न्या. ए.पी शाह हे मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात असून ही समिती पुढील महिन्यात सुप्रीम कोर्टासमोर अहवाल सादर करणार आहे.