शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

स्फोट आरडीएक्समुळे झाल्याची शक्यता?

By admin | Published: September 14, 2015 1:28 AM

मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथे शनिवारी झालेला भीषण स्फोट बहुधा आरडीएक्स अथवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे घडला असावा,

नवी दिल्ली/औरंगाबाद/झाबुआ : मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावद येथे शनिवारी झालेला भीषण स्फोट बहुधा आरडीएक्स अथवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे घडला असावा, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे. या स्फोटात ९० जण ठार आणि शंभरावर लोक जखमी झाले आहेत.महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना मोहन प्रकाश म्हणाले, एवढा भीषण स्फोट एका सिलिंडरमुळे झाला असेल, यावर विश्वास बसत नाही. हा स्फोट आरडीएक्स किंवा त्याहीपेक्षा अधिक शक्तिशाली स्फोटांमुळे झाला असणार. कारण या स्फोटात चार बहुमजली इमारती पूर्णपणे जमीनदोस्त झालेल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने त्याचा तपास केला पाहिजे.दरम्यान, स्थानिक भाजपा नेत्याला नियम धाब्यावर बसवून वर्दळीच्या भागात स्फोटके साठवून ठेवण्याची परवानगी देण्यात आल्यामुळेच हे भीषण स्फोटकांड घडले, असा स्पष्ट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी नवी दिल्ली येथे केला. ‘मुख्यमंत्र्यांनी आरोपींविरुद्ध कोणती कारवाई केली? चौहान यांच्या राजवटीखालील मध्यप्रदेश आता ‘मृत्यूचे राज्य’ बनले आहे, असे सिंघवी यांनी म्हटले आहे.हे कसे घडले? भाजपाच्या व्यापार मंडळाचा जिल्हा प्रमुख पेटलावदच्या मध्य भागात हा स्फोटकांचा कारखाना चालवीत होता. तो भाजपाचा नेता नसता तर स्थानिक प्रशासनाने त्याला हा कारखाना चालविण्याची परवानगी दिली असती काय, असा सवाल सिंघवी यांनी केला. आता चौहान यांच्या राजवटीत व्यापमं घोटाळ्यात अनेक जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता हे शंभर लोक मारले गेले आहेत, असे ते म्हणाले. पेटलावद येथील भीषण स्फोटानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना प्रक्षुब्ध जमावाचा विरोध आणि रोषाचा सामना करावा लागला. रविवारी सकाळी १० वाजता चौहान यांचा ताफा पेटलावदच्या शासकीय रुग्णालयाजवळ दाखल होताच जमाव संतप्त झाला.यावेळी जमावाने चौहान यांना घेराव केला आणि प्रशासन व पोलिसांच्या विरोधात नारेबाजी केली. लोकांचा रोष लक्षात घेऊन स्वत: चौहान हे कारमधून उतरले आणि रस्त्यावर बसले. यावेळी त्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या स्फोटाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश दिला.(लोकमत न्यूज नेटवर्क)