शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

देशात पुन्हा 'आणीबाणी'ची शक्यता - लालकृष्ण आडवाणी

By admin | Published: June 18, 2015 9:47 AM

भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी)४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होणार नाही हे खात्रीलायकपणे सांगता येत नाही असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ - भारतात आणीबाणीला(इमर्जन्सी) ४० वर्ष होऊन गेली असली तरी देशात पुन्हा आणीबाणी लागू होऊ शकते. सध्या संविधान व कायद्याचे कवच असूनही लोकशाहीला चिरडणे सहज शक्य असल्याची भीती लालकृष्ण आडवाणी यांनी व्यक्त केली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे मार्गदर्शक लालकृष्ण आडवाणी यांनी गुरुवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. देशात इंदिरा गांधी सरकारने लादलेल्या आणीबाणीला यावर्षी ४० वर्ष होत असून यानिमित्त लालकृष्ण आडवाणींनी देशातील सद्य राजकीय स्थितीवर परखड मतं मांडली आहेत. १९७५ - ७७ या आणीबाणीच्या काळानंतरही देशात पुन्हा नागरिकांच्या स्वातंत्र्यांवर गदा येणार नाही असे नाही. या गोष्टी सहजपणे करणे शक्य नसले तरी अशा गोष्टी घडूच शकणार नाही असे नाही. नागरिकांचे मुलभूत हक्क पुन्हा हिरावून घेतले जाऊ शकतात असे आडवाणींनी म्हटले आहे. 
पुन्हा आणीबाणी येईल असे का वाटते असा प्रश्न विचारला असता आडवाणी म्हणाले, आपल्या राजकीय व्यवस्थेत असे कोणतेही संकेत दिसत नाही की आपण निर्धास्त राहू, राजकीय नेतृत्वापासूनही कोणतेही चांगले संकेत मिळत नाही, सध्याचे राजकीय नेतृत्व परिपक्व नाही असा याचा अर्थ नाही, पण विद्यमान नेतृत्वांवर विश्वास ठेवता येत नाही असेही त्यांनी नमूद केले. केंद्रात मोदी सरकार सत्तेवर असतानाच आडवाणींनी हे विधान करुन मोदींवर निशाणा साधल्याची चर्चा रंगली आहे.