शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Power Crisis In India: या 4 कारणांमुळे भारतावर ओढावलंय कोळशाचं संकट, जाणून घ्या सरकार काय करत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 10:55 IST

India Power Crisis: सरकारने एक कोअर मॅनेजमेंट कमिटी स्थापन केली असून, ही कमिटी कोळशाच्या साठ्यांवर देखरेख आणि व्यवस्थापन पाहते.

नवी दिल्ली: देशभरात कोळशाच्या पुरवठ्याअभावी 'ब्लॅक आऊट'चा धोका निर्माण झाला आहे. वीज प्रकल्पांना आवश्यकतेनुसार कोळसा मिळत नसल्याने वीज उत्पादनावर मोठा परिणाम पडू शकतो. या कोळशाच्या संकटामुळे अनेक राज्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पुरवठा लवकरच सुधारेल असे म्हटले आहे. 

उर्जा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोळशाच्या पुरवठ्यातील कमतरतेमागे अनेक कारणे आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, आयात केलेल्या कोळशाच्या किमती वाढल्याने पुरवठा कमी झाला आहे. देशातील कोळशाच्या कमतरेमागे सरकारने चार कारणे सांगितले आहेत. 

1. अर्थव्यवस्था सुधारल्याने विजेची मागणी वाढली आहे.

2. सप्टेंबरमध्ये कोळशाच्या खाणींच्या आसपास अतिवृष्टीमुळे कोळशाच्या उत्पादनावर परिणाम झाला.

3. परदेशातून येणाऱ्या कोळशाच्या किमती वाढल्या.

4. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोळशाची साठवन केली नाही.

विजेचा वापर वाढला

कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था हळु-हळू सुधारू लागली. यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सध्या, दररोज 4 अब्ज युनिट्सचा वापर केला जात असून, यातील 65% ते 70% वीज कोळशापासून बनवली जाते. 2019च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विजेचा वापर 106.6 अब्ज युनिट होता, तर या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 124.2 युनिटचा वापर झाला आहे. या काळात कोळशापासून विजेचे उत्पादन 2019 मध्ये 61.91% वरुन 66.35% पर्यंत वाढले. ऑगस्ट-सप्टेंबर 2019 च्या तुलनेत या वर्षाच्या त्याच दोन महिन्यात कोळशाचा वापर 18% वाढला.

मार्च 2021 मध्ये इंडोनेशियन कोळशाची किंमत $ 60 प्रति टन होती, जी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाढून $ 160 प्रति टन झाली. यामुळे कोळशाची आयात कमी झाली आहे. आयातित कोळशापासून वीजनिर्मिती 2019 च्या तुलनेत 43.6% कमी झाली आहे, ज्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर 2021 दरम्यान देशांतर्गत कोळशावर 17.4 मे.टन अतिरिक्त मागणी वाढली आहे.

सरकार काय करत आहे?कोळशाच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी ऊर्जा मंत्रालयाने कोअर मॅनेजमेंट टीमची स्थापना केली आहे. ही टीम आठवड्यातून दोनदा कोळशाच्या साठ्याचे निरीक्षण आणि व्यवस्थापन पाहते. या समितीमध्ये ऊर्जा मंत्रालयाचे अधिकारी, सीईओ, पोसोको, रेल्वे आणि कोल इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. या समितीची 9 ऑक्टोबर रोजी बैठक झाली. त्यात नमूद केले आहे की, 7 ऑक्टोबर रोजी कोल इंडियाने एका दिवसात 1.501 मेट्रिक टन कोळसा पाठवला, ज्यामुळे वापर आणि पुरवठा यातील अंतर कमी झाले. येत्या तीन दिवसांत 1.6 मेट्रिक टनावर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीजCoal Allocation Scamकोळसा खाण घोटाळाCoal Shortageकोळसा संकट