शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून तेजस्वी यादवची पाठराखण

By admin | Published: July 15, 2017 12:36 PM

भाजपात असूनही नेहमी पक्षावर सडेतोड टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी राजीनाम्याची टांगती तलावर डोक्यावर घेऊन फिरणा-या तेजस्वी यादवचा बचाव केला आहे

ऑनलाइन लोकमत
नली दिल्ली, 15 - तेजस्वी यादवमुळे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या पक्षातील अंतर सध्या वाढत चाललं आहे. दरम्यान भाजपात असूनही नेहमी पक्षावर सडेतोड टीका करणारे शत्रुघ्न सिन्हा यांनी राजीनाम्याची टांगती तलावर डोक्यावर घेऊन फिरणा-या तेजस्वी यादवचा बचाव केला आहे. "फक्त आरोप लागलेत म्हणून राजीनामा देण्याची गरज नाही. याआधीही अनेक वेळा असं झालं आहे", असं शत्रुघ्न सिन्हा बोलले आहेत.  
 
आणखी वाचा
८० आमदारांचा धाक दाखवू नका, तेजस्वी प्रकरणी स्पष्टीकरण द्या - जेडीयू
चारा घोटाळ्यावेळी लालूप्रसाद ‘क्लीन शेव्हड्’ होते, उद्धव ठाकरेंचा तेजस्वी यादवला टोला
"पहा, लालूंचा मुलगा कसा गुंडागर्दी वाढवत आहे", तेजस्वी यांचे ट्विट
 
शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, "जर आरोपांच्या आधारे एखाद्याचा राजीनामा घेत असाल, तर याआधी असं कधी झालं आहे का. अनेक असे पक्ष आहेत ज्यांच्यावर फक्त एफआयरआरच नाही तर चार्जशीट दाखल झाली असूनही अद्याप आपल्या पदावर कायम आहेत".
 
"मला बातम्या किंवा अफवांच्या आधारे काही बोलू इच्छित नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. नितीश कुमार आणि लालू यादव दोघेही परिपक्व आहेत. यावेळी सर्वांनी बिहारच्या हिताकडे लक्ष दिलं पाहिजे", असं मत शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. "लवकरच राष्ट्रपतिपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळं तेजस्वी यांच्या विरोधात हे राजकीय षडयंत्र असू शकतं," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. 
 
सोनिया गांधींची मध्यस्थी
आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने सोनिया गांधी प्रयत्न करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींनी लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंत लालूप्रसाद यांनी थोडी नमती भूमिका घेतल्याचं सुत्रांकडून कळत आहे. 
 
राष्ट्रपती निवडणुकीनंतर तेजस्वी यादव देणार राजीनामा - सूत्र
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व काही सुरळीत झालं तर राष्ट्रपती निवडणुकीनंतर तेजस्वी यादव नितीश कुमार सरकारमधून राजीनामा देऊ शकतात. जदयूदेखील तेजस्वीच्या राजीनाम्यावर अडून आहे. जदयूच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यासंबंधी वक्तव्य केली आहेत. 
 
तेजस्वींच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही - लालूप्रसाद यादव
भ्रष्टाचाराचे आरोप झालेले बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट शब्दात धुडकावून लावली आहे. केवळ गुन्हा दाखल होणे हे राजीनाम्या साठी पुरेसे कारण ठरू शकत नाही, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. लालू यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्यातील मदभेद अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.