शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

Prashant Kishor: “राहुल गांधींनी गुजरात किंवा अन्य भाजपशासित राज्यातून भारत जोडो यात्रा सुरु करायला हवी होती”

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:19 PM

राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

Prashant Kishor: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) सक्रीय झाले आहेत. ३५०० किमी अंतर १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधून जाणाऱ्या या यात्रेची सांगता ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा आता कर्नाटकात पोहोचणार आहे. यातच रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या यात्रेवर आपली प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांना एक सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. 

या वर्षाच्या सुरुवातीला प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्यांनी सांगितले की, त्यांनी निवडणूक रणनीतिकार म्हणून नेतृत्व करण्याची ऑफर नाकारली होती. दुसरीकडे वेगळ्या विदर्भासाठी प्रशांत किशोर यांनी कंबर कसली असून, आता विदर्भाला देशातील नवे राज्य करण्यासाठी प्रशांत किशोर सक्रीय झाले आहेत. यातच प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर प्रतिक्रिया व्यक्त करत स्पष्ट भाष्य केले आहे. 

भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गुजरात किंवा भाजपशासित इतर कोणत्याही राज्यातून सुरू व्हायला हवी होती. काँग्रेसने आपली भारत जोडो यात्रा गुजरातमधून सुरू करायला हवी होती. कारण येथे या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत, किंवा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सारख्या भाजपशासित राज्यांमधून ही यात्रा सुरु करायला हवी होती, असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. यातच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरूर हे या निवडणुकीत आपला अर्ज दाखल करू शकतात. तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल गांधी यांनीच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी, असा ठराव एकमताने मंजूर केला आहे. 

 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरRahul Gandhiराहुल गांधी