शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

“बिहारची कायदा-सुव्यवस्था पार लयाला गेली”; प्रशांत किशोर यांचा RJD-नितीश कुमारांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 18:16 IST

Prashant Kishor News: RJD सत्तेत येते, तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Prashant Kishor News: राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. जनसुराज पदयात्रेचे संयोजक असलेले प्रशांत किशोर हे बिहारमधील समस्तीपूर येथे पदयात्रा करत आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी महाआघाडी, राजद आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जेव्हापासून महाआघाडी स्थापन झाले आहे, तेव्हापासून बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी भीती लोकांच्या मनात आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रशासनाकडे अजिबात लक्ष नाही, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. नितीश कुमार यांनी आपल्या फायद्यासाठी राजकीय मजबुरीत अडकलेले आहेत. कोणती राजकीय युती करायची, कोणाला जोडायचे, कोणाला काढून टाकायचे, सरकार कसे वाचवायचे आणि खुर्ची कशी वाचवायची यावरच नितीश कुमार यांचा संपूर्ण वेळ खर्च होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बघायला त्याला वेळ कुठे आहे, या शब्दांत प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला. 

RJD सत्तेत येते, तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते

कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचे आणखी एक कारण म्हणजे दारूबंदीचा कायदा. दारूबंदी कायदा लागू आहे, मात्र केवळ दारूची दुकाने बंद करण्यात आली आहेत. परंतु, इथे तर घरोघरी दारूची विक्री सर्रासपणे सुरू आहे. प्रशासन यंत्रणा दारूबंदीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली राहणार, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. तसेच बिहारमधील जनतेत अशी कुजबूज आहे की, जेव्हा-जेव्हा राजद सरकारमध्ये असते तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते. गेल्या चार-पाच महिन्यांपासून बिहारची परिस्थिती बिकट होत चालली आहे, ही गोष्ट आपण बिहारमध्येही पाहत आहोत, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार