शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

“बिहारची कायदा-सुव्यवस्था पार लयाला गेली”; प्रशांत किशोर यांचा RJD-नितीश कुमारांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 6:14 PM

Prashant Kishor News: RJD सत्तेत येते, तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला आहे.

Prashant Kishor News: राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांनी बिहारमधील सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. जनसुराज पदयात्रेचे संयोजक असलेले प्रशांत किशोर हे बिहारमधील समस्तीपूर येथे पदयात्रा करत आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना प्रशांत किशोर यांनी महाआघाडी, राजद आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जेव्हापासून महाआघाडी स्थापन झाले आहे, तेव्हापासून बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी भीती लोकांच्या मनात आहे, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रशासनाकडे अजिबात लक्ष नाही, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. नितीश कुमार यांनी आपल्या फायद्यासाठी राजकीय मजबुरीत अडकलेले आहेत. कोणती राजकीय युती करायची, कोणाला जोडायचे, कोणाला काढून टाकायचे, सरकार कसे वाचवायचे आणि खुर्ची कशी वाचवायची यावरच नितीश कुमार यांचा संपूर्ण वेळ खर्च होत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बघायला त्याला वेळ कुठे आहे, या शब्दांत प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला. 

RJD सत्तेत येते, तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते

कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचे आणखी एक कारण म्हणजे दारूबंदीचा कायदा. दारूबंदी कायदा लागू आहे, मात्र केवळ दारूची दुकाने बंद करण्यात आली आहेत. परंतु, इथे तर घरोघरी दारूची विक्री सर्रासपणे सुरू आहे. प्रशासन यंत्रणा दारूबंदीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत नाही, तोपर्यंत कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली राहणार, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली. तसेच बिहारमधील जनतेत अशी कुजबूज आहे की, जेव्हा-जेव्हा राजद सरकारमध्ये असते तेव्हा समाजकंटकांचे मनोबल वाढते. गेल्या चार-पाच महिन्यांपासून बिहारची परिस्थिती बिकट होत चालली आहे, ही गोष्ट आपण बिहारमध्येही पाहत आहोत, असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNitish Kumarनितीश कुमारTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहार