शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मोदी सरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होणार; भाजपकडून मोठ्या जल्लोषाची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:38 IST

8th Year Modi Government Prepration for Celebration : मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदीसरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी परिषद, युवा परिषद आणि मागासवर्गीयांसाठी परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच, देशातील मंदिरांमध्ये आपआपल्या स्तरावर पूजेचे कार्यक्रम आयोजित केले जातील. याशिवाय, या कार्यक्रमांमध्ये हनुमान चालिसाचे पठणही करण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. ही टीम मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर होणारे कार्यक्रम ठरवणार आहे. देशभरात कार्यक्रमांसोबतच सरकारच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. भाजपने सप्ताह बुथ कमिटी टीम तयार केली आहे. या कमिटीमध्ये 4 ते 5 सदस्य असतील, जे देशभरात भाजप कमकुवत असलेल्या बूथवर भाजप मजबूत करण्यासाठी काम करतील.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी कमकुवत बूथ मजबूत करणे हे भाजपचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विजयंत पांडा हे भाजपच्या कमकुवत बूथ टीमचे नेतृत्व करत आहेत. या टीममध्ये भाजपचे सरचिटणीस सीटी रवी, लाल सिंग आर्य आणि इतर काही नेत्यांचा समावेश आहे. पक्षाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या देखरेखीखाली 12 नेत्यांची टीम तयार केली आहे. या संघाने कोणत्या स्तरावर काम करायचे आहे, याचा निर्णय 5 मेपर्यंत केंद्रीय नेतृत्वाकडे सोपविला जाणार आहे. यानंतर मोदी सरकारच्या 8 वर्षांचा उत्सव कसा साजरा करायचा हे ठरवले जाईल.

गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे उत्सव साजरा झाला नाहीयाआधी, मोदी सरकारने गेल्या वर्षी आपल्या कार्यकाळाची 7 वर्षे पूर्ण केली, तेव्हा कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचला होता. त्यामुळेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपशासित राज्यांना सांगितले होते की, कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोदी सरकारच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. अशा कार्यक्रमांऐवजी राज्य सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कल्याणकारी योजना सुरू कराव्यात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारBJPभाजपा