शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

भाजपा व काँगे्रसविरोधी आघाडीची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:33 IST

तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते.

हैदराबाद  - तेलंगणचे मुख्यमंत्री व तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) नेते के. चंद्रशेखर राव (केसीआर) वर्षभरापासून प्रादेशिक पक्षांच्या राष्ट्रीय आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशीही याबाबत केलेली चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते.देश पातळीवर काँग्रेसेतर व भाजपेतर पर्यायाची गरज असल्याचे त्यांचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. हे काही घाईत टाकलेले पाऊल नाही. राव यांची वक्तव्ये ही गांभीर्याने घेण्याची गरज टीआरएसच्या नेत्यांनी बोलून दाखवली. प्रादेशिक पक्षांना एका व्यासपीठावर आणावे ही कल्पना राव यांच्या डोक्यात आहेच, असे सांगून टीआरएसचा नेता म्हणाला की, काँग्रेस व भाजपसारख्या मोठ्या पक्षांसोबत काम करतानाचा प्रादेशिक पक्षांचा अनुभव फारसा चांगला नाही, या निष्कर्षाला केसीआर आले आहेत.राष्ट्रीय स्तरावरील मोठे राजकीय पक्ष त्यांच्या आघाडीतील भागीदार पक्षांशी फारच थोडा समन्वय राखतात, असा अनुभव आहे. हा मुद्दा महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीत सुरू असलेल्या तणावातून तसेच शेजारच्या आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्ष व भाजपा यांच्या नात्यात निर्माण झालेल्या तणावातून स्पष्ट होईल, असे राव म्हणाल्याचे समजते. (वृत्तसंस्था)सुरुवातीला आघाडी, नंतर एकजूटया तणावांना पूर्णविराम देण्यासाठीच राव प्रादेशिक राजकीय पक्षांना एकत्र बांधण्याची योजना तयार करीत आहेत. धर्मनिरपेक्ष विचारांच्या प्रादेशिक समविचारी पक्षांना सामाजिक न्यायाच्या समान व्यासपीठावर एकत्र आणण्याचा आमचा हेतू आहे, असे खा. बी. विनोद कुमार म्हणाले. सुरुवातीला राजकीय पक्षांची असे त्याचे स्वरूप दिसेल, पण नंतर ते एकत्र आल्याचे दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस