शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

२०२४ ची तयारी सुरू; अमेठीतून स्मृती इराणी, अक्षय कुमार दिल्लीतून लढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 1:56 PM

अक्षयकुमारने अलिकडेच भारताचं नागरिकत्व मिळवलं आहे

संजय शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पुन्हा निवडणूक लढविण्याचे आव्हान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वीकारले आहे. राहुल गांधी वायनाडला का गेले, असे अमेठीची जनता आता त्यांना विचारणार आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी आता सुरू झाली आहे. राहुल गांधी अमेठीमधूनच लढणार, अशी घोषणा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी केल्यानंतर राजकारण तापले आहे.

स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या अमेठीमधून निवडणूक लढविण्याच्या वृत्तावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला आता अमेठीत काही करावे लागणार नाही. अमेठीची जनताच राहुल गांधी यांना विचारणार आहे की, अखेर त्यांना केरळच्या वायनाड मतदारसंघात का जावे लागले?

इराणी यांनी गांधी कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ अमेठीमध्ये २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना ५५,१२० मतांनी पराभूत केले होते. तेव्हा अमेठीबरोबरच राहुल यांनी सुरक्षित मतदारसंघ वायनाडमधूनही निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले. अमेठी मतदारसंघ गांधी कुटुंबीय सहजासहजी सोडणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.

अक्षयकुमार दिल्लीच्या चांदनी चौकातून लढण्याची चर्चा

  अलीकडेच कॅनडाचे नागरिकत्व सोडून भारताचे नागरिकत्व घेणारे चित्रपट अभिनेते अक्षयकुमार यांना भाजपच्या तिकिटावर दिल्लीच्या चांदनी चौक मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाऊ शकते.   भाजपचे ज्येष्ठ नेते अक्षयकुमारच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक कामांची अक्षयकुमारने सार्वजनिकरीत्या अनेकदा स्तुती केलेली आहे.   अक्षयकुमार एकेकाळी दिल्लीच्या चांदनी चौकातील प्रसिद्ध ‘पराठेवाली गली’मध्ये राहत होता.   चांदनी चौक लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व सध्या डॉ. हर्षवर्धन करीत आहेत. त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीAkshay Kumarअक्षय कुमारBJPभाजपा