शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

राज्यघटनेचे पावित्र्य राखा : राष्ट्रपती

By admin | Published: February 10, 2016 2:14 AM

राज्यघटनेचे पावित्र्य राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना केले. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून

नवी दिल्ली : राज्यघटनेचे पावित्र्य राखा, असे आवाहन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी राज्यपालांच्या दोनदिवसीय परिषदेचे उद्घाटन करताना केले. अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून राज्यपालांच्या भूमिकेचा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आला असताना मुखर्जी यांच्या आवाहनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.घटनात्मक पदांवरील व्यक्तींनी राज्यघटनेने घालून दिलेल्या तत्त्वांना बांधील राहणे आवश्यक आहे. राज्यघटनेत लोकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होत असून त्याची पूर्तता करण्यासाठी सर्वसमावेशक असे मार्गही दाखविले आहेत. घटनात्मक पदांवर असलेल्या सर्वांना राज्यघटनेचे प्रावित्र्य राखणे अपरिहार्य ठरते, असे ते राष्ट्रपती भवनात आयोजित राज्यपालांच्या परिषदेला संबोधित करताना म्हणाले. राज्यपाल जे.पी. राजखोवा यांनी अरुणाचलमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेल्याच्या पार्श्वभूमीकडे त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अंगुलीनिर्देश केल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय मुद्दे चर्चेतून सोडविण्याचे प्रयत्न कायम ठेवावे लागतील, असेही ते म्हणाले. या परिषदेला २३ राज्यपाल आणि नायब राज्यपाल उपस्थित होते.दुष्काळाकडे वेधले लक्ष...लागोपाठ दोन वर्षे अपुऱ्या पावसामुळे देशाला दुष्काळाचा फटका बसला आहे. कोरड्या दुष्काळाचा परिणाम कृषी उत्पादन घटण्यात होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांची जोखीम उचलता यावी यासाठी नुकतीच प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. अशा प्रयत्नांतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे. वातावरणाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी कृषी संशोधन संस्थांनी धान्य आणि अन्य पिकांचे दुष्काळात तग धरू शकणारे वाण विकसित करायला हवे, असेही राष्ट्रपती म्हणाले.