शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

राष्ट्रपती मुखर्र्जींकडून पुन्हा सहिष्णुतेचे आवाहन

By admin | Published: November 22, 2015 3:00 AM

संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा

नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या असहिष्णुतेमुळे निर्माण झालेल्या वाईट परिस्थितीचा सामना करीत असून, भारताची बहुविविधता टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांना बळ देण्यासोबतच जगभरात त्याचा प्रचार-प्रसार करण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी केले.भारततज्ज्ञांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जगाला अजूनही भारताकडून केवळ सहिष्णुताच नाही तर सहानुभूतीच्या विचारांची शिकवण घ्यायची आहे, या स्वामी विवेकानंदांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करून देताना भारत ज्या विचारांसाठी ओळखला जातो त्याचा पुनरुच्चार मुखर्जी यांनी केला. ते म्हणाले की, आज साऱ्या जगात असहिष्णुता आणि द्वेषाचे वातावरण पसरले असून, न भूतो न् भविष्यती अशी अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या असहिष्णुतेशी आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे.यावेळी भारताचा आत्मा असलेले उच्च मूल्य, लिखित व अलिखित संस्कार, कर्तव्य आणि जीवनशैलीच आपल्याला या संकटातून मार्ग दाखवू शकते, असेही मुखर्जी यांनी अधोरेखित केले. गोमांस सेवनाच्या अफवेवरून दादरीत घडलेले हत्याकांड आणि त्यानंतरच्या घटनांपासूनच मुखर्जी सहिष्णुता बाळगण्याचे आवाहन करीत आहेत. (वृत्तसंस्था)