शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट

By admin | Published: March 28, 2016 3:45 AM

उत्तराखंडमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संकटाला रविवारी नवे वळण मिळाले असून, केंद्र सरकारने सत्ताधारी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे प्रशासन कोलमडल्याचे

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय संकटाला रविवारी नवे वळण मिळाले असून, केंद्र सरकारने सत्ताधारी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे प्रशासन कोलमडल्याचे कारण पुढे करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी होऊ घातलेली शक्तिपरीक्षा निरर्थक ठरली आहे.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशींवरून रविवारी सकाळी विधानसभा निलंबित ठेवण्यात आल्याचे स्पष्ट होताच या राज्यातील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रात्री उशिरा झालेल्या तातडीच्या बैठकीत उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी मोदी आसामची भेट अर्धवट सोडून घाईघाईने दिल्लीला परतले होते.राज्यपाल के.के. पॉल यांनी केंद्राला सादर केलेल्या अहवालात या राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याचे तसेच सोमवारी विधानसभेत होणाऱ्या शक्तिप्रदर्शनाच्या वेळी गोंधळ होण्याची भीती व्यक्त केली होती.भाजपाने बंडखोरीसाठी भडकवले - रावतआमदारांना सुमारे २५-२५ कोटी रुपये देत बंडखोरीसाठी भडकविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रपती राजवट लागू होताच पदच्युत झालेले मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केला आहे. भाजपाने केंद्रीय नेतृत्वाशी संगमनत करीत माझे सरकार पाडले आहे. एका कटानुसार उत्तराखंडमध्ये आमदारांची सौदेबाजी झाली आहे. बंडखोर आमदारांची संख्या ९च्या पलीकडे जात नसल्याचे आढळून येताच उपरोक्त रकमेची बोली लावण्यात आली, असे ते म्हणाले. राज्यात विकास नाही झाला तरी चालेल, मात्र रावत सरकार स्थिर राहू नये हाच एकमेव अजेंडा भाजपाने राबविला. मी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच एका आठवड्याच्या आतच माझ्याविरुद्ध विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणणारा हा पक्ष सरकार पाडण्यासाठी किती आतुर झाला होता हेच दिसून येते, असेही ते म्हणाले.ही लोकशाहीची हत्या - काँग्रेसचा आरोपयोग्यरीत्या निवडून आलेले सरकार बडतर्फ करणे ही लोकशाहीची हत्या असून, केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू करणे घटनाविरोधी ठरते. भाजपाचा लोकशाहीवर विश्वास नाही हेच त्यातून दिसून येते, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले. छोट्या राज्यांमधील निवडून आलेली सरकारे लोकशाहीविरोधी आणि बेकायदेशीर मार्गाने पाडली जाणे हीच सरकारची खरी इच्छा आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामागे कोणतेही आश्चर्य नाही. प्रत्येक पावलातून घटनात्मक नियम तोडले जात आहेत, असे काँग्रेसच्या सरचिटणीस अंबिका सोनी यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी यापेक्षा चांगले उदाहरण असूच शकत नाही. उत्तराखंडमध्ये राज्यघटना पूर्णपणे कोलमडून पडली आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे चांगला आधार होता. १८ मार्च रोजीच मुख्यमंत्री रावत यांनी बहुमत गमावले होते.- अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्रीहरीश रावत यांचे सरकार भ्रष्टाचारात सहभागी असल्यामुळे ते बडतर्फ करण्याची गरज होती. मी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे स्वागत करतो. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट फार काळ राहू शकणार नसल्यामुळे नव्याने निवडणुका होतील. हे स्वागतार्ह असे पाऊल आहे.- विजय बहुगुणा, काँग्रेसचे बंडखोर नेते