शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कर्नाटकमध्ये हवी होती राष्ट्रपती राजवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:45 IST

सध्या पक्षापेक्षा जात, पंथ, भाषा व इतर मुद्द्यांकडे बघूनच मतदान होते.

हैदराबाद : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कोणालाच बहुमत मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले व त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. अशा परिस्थितीत तिथे राष्ट्रपती राजवट लागू करणे हेच योग्य पाऊल ठरले असते असे मत माजी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले.त्यांनी म्हटले आहे की, स्वबळावर सरकार स्थापन करता येईल, इतक्या जागा कोणत्याच पक्षाला जिंकता आल्या नाहीत. अशा स्थितीत राज्यपाल वजुभाई वालिया यांनी तीन महिन्यांकरिता राष्ट्रपती राजवट या राज्यात लागू करायला हवी होती. या कालावधीत जर कोणालाही सरकार स्थापणे शक्य झाले नसते तर विधानसभा बरखास्त करुन नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस राज्यपालांना करता आली असती.राष्ट्रपती राजवट हाच या प्रश्नावरचा तोडगा आहे असे नाही. मात्र आमदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी झालेले प्रयत्न, त्यातून होणारा घोडेबाजार व पैशाचा खेळ, खातेवाटपावरुन होणारी भांडणे, वाया जाणारा वेळ अशा साऱ्या गोष्टी राष्ट्रपती राजवट लागू केली असती तर टाळता आल्या असत्या.मतांची अट आवश्यकसध्या पक्षापेक्षा जात, पंथ, भाषा व इतर मुद्द्यांकडे बघूनच मतदान होते. त्याऐवजी निवडणुकांत एखाद्या पक्षाला जितकी टक्के मते मिळतील त्या प्रमाणात त्यांना जागा देण्याची पद्धत असावी. अथवा निवडणुकीत झालेल्या मतदानापैकी ३३.३३ टक्के मते ज्या उमेदवाराला मिळाली असतील त्याला विजयी घोषित करावे. ती कोणाला मिळाली नाहीत तर तिथे पुन्हा निवडणूक घ्यावी. अनेक देशांमध्ये ५० टक्क्यांवर मते मिळालेल्याच विजयी घोषित केले जाते. ही पद्धत अस्तित्वात आणण्याची पहिली पायरी म्हणून ३३.३३ टक्के निकषाची अंमलबजावणी केली पाहिजे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८