शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

मोदी सरकारच्या काळात न्यायव्यवस्थेवर दबाव? सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं मोठं विधान, म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 6:43 PM

DY Chandrachud : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निवडणूक आयोगाबाबत दिलेला निकाल हे त्याचं उदाहरण आहे, असं स्पष्टपणे सांगितलं.

सध्या सुरू असलेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झालेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी भारतातील न्यायव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण अशा विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडलं आहे. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवर कुठलाही दबाव नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निवडणूक आयोगाबाबत दिलेला निकाल हे त्याचं उदाहरण आहे, असं स्पष्टपणे सांगितलं.

यावेळी कोर्टात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा उल्लेख करत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितलं की, आमच्याकडे प्रलंबित खटल्यांची संख्या मोठी आहे. तसेच ही संख्या लोकांचा न्यायव्यवस्थेवर असलेला विश्वासही दर्शवते. यावेळी सरन्यायाधीशांनी जिल्हा न्यायपालिकेमध्ये पायाभूत चौकटीची कमतरता असून, त्यात सुधारणेची गरज आहे, असे सांगितले.

न्यायव्यवस्थेवरील दबावाबाबतच्या प्रश्नाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की,  माझ्या २३ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये कुणीही मला कुठल्याही खटल्याचा निकाल कसा द्यावा, याबाबत सांगितलेलं नाही. यावेळी कायदेमंत्री किरेन रिजिजू यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना मी कायदेमंत्र्यांसोबत कुठल्याही मुद्द्यामध्ये अडकू इच्छित नाही, आमच्या मतांमध्ये अंतर आहे,  असे त्यांनी सांगितले.  हमारी धारणाओं में अंतर है. दरम्यान, सरकारकडून न्यायव्यवस्थेवर कुठलाही डबाव नाही आहे. नुकताच निवडणूक आयुक्तांबाबत दिलेला निर्णय हे त्याचं उदाहर आहे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय न्यायव्यवस्थेला आणखी आधुनिक बनवण्याची गरज आहे. आमचं मॉडेल हे ब्रिटिशांकडून मिळालेल्या वसाहतवादी मॉडेलवर आधारित आहे. पुढच्या ५०-७५ वर्षांमध्ये आपल्याला भारतीय न्यायव्यवस्थेला आधुनिक तंत्राने समृद्ध केलं पाहिजे. कोरोनाच्या साथीच्या काळात आपण व्हिडीओ कॉन्फ्रन्स प्लॅटफॉर्मवर ज्या प्रकारे काम केलं, ते जगाच्या कुठल्याही भागासाठी अभूतपूर्व आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत