शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कानडी संस्कृतीचा अभिमान व संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:38 IST

जनतेच्या मनातील बात : १ कोटींना नोकऱ्या, तरुणांना स्मार्टफोन, घराघरात पाणी व मोफत शिक्षण

मंगळूर : कानडी भाषा, संस्कृती, नृत्य, संगीत, साहित्य, लोकसंगीत व लोकसंगीत यांना प्रोत्साहन व त्यांचे संवर्धन यांचे आश्वासन असलेल्या काँग्रेसच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यात १ कोटी लोकांना रोजगार तसेच तरुणांना स्मार्टफोन ही आश्वासने देण्यात आली आहेत. कानडी अभिमानावर भर असाच या जाहीरनाम्याचा एकूण सूर आहे.कानडी भाषेच्या विकासासाठी धारवाडमध्ये साहित्य भाषा प्राधिकरण व गदगमध्ये कानडी साहित्य व संगीत, काव्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नाट्यगृह स्थापन करण्याची घोषणाही यात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जाहीरनामा प्रकाशित करताना भाजपा व पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या व अनेक काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.मागच्या जाहीरनाम्यात दिलेली ९५ टक्के आश्वासने आमच्या सरकारने पूर्ण केली असल्याचा दावा करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी केवळ मन की बात नावाचा कार्यक्रम करतात. आम्ही प्रत्यक्षात जनतेच्या मनातील बात जाहीरनाम्यात उतरवली आहे. मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही.या जाहिरनाम्यात द. रा. बेंद्रे, एन. के. कुलकर्णी, आर. सी. हिरेमा, डॉ. पॉल पुअप्पा, जी. पी. अमुर, गिराद्दी गोविंदराज, चन्नावीरा कनावी या साहित्यिक, लेखक तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा उल्लेख आवर्जून केला आहे. कानडी साहित्य-संस्कृती आणि इतिहासातील कवी, संत, साहित्यिक व अन्य मान्यवरांचा यातील उल्लेखामुळे प्रथमच पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील वेगळेपण दिसत आहे.बसवेश्वर यांचाही उल्लेखजाहीरनाम्यात बसवेश्वर यांंचाही उल्लेख आहे. त्यांच्या सर्वधर्मसमभावावर आमचा विश्वास आहे, असे त्यात म्हटले आहे. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्याबरोबरच कर्नाटकातील काँग्रेसचे नेते देवराज अर्स यांच्या शिकवणुकीनुसार आम्ही विकास कार्य करीत आहोत, असे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.महत्त्वाचे मुद्दे : याशिवाय प्रत्येक घरात पाणी, शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट, शेतकºयांच्या साह्यासाठी विशेष निधी, उत्तम दर्जाचे शिक्षण, मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, अल्पसंख्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा ही आश्वासनेही काँग्रेसने मतदारांना दिली आहेत.येत्या पाच वर्षांत राज्यातील १ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले असून, सर्व तरुणांना स्मार्टफोन देण्याचेही घोषित केले आहे. पंधराव्या वित्त आयोगाने अत्यल्प निधी परत करून कर्नाटकवर अन्याय केल्याचा उल्लेख त्यात आहे. तसेच राज्यांच्या अधिकारांवर केंद्राकडून होणाºया अतिक्रमणाचा मुद्दाही त्यात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८