शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये बसपा प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्यावर हल्ला, 6 आरोपींनी घरासमोरच केली हत्या
2
"सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात समन्वय आवश्यक, हा विषय लवकर संपवा"; चव्हाण, भुमरे, जरांगे यांच्यात दोन तास चर्चा
3
मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...
4
'सूर्याचा कॅच अन् आम्ही 50 जणांनी 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट', CM शिंदेंची तुफान फटकेबाजी
5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयात, सरसंघचालकांसोबत चर्चा
6
“मुंबईत १ लाख लोक मावतील एवढे स्टेडियम व्हावे”; फडणवीसांची रोहित शर्मा समोरच मागणी
7
Anant Ambani And Radhika Merchant Wedding : धोनी आणि साक्षीची 'संगीत समारंभा'ला हजेरी, Video
8
Rohit Sharma Suryakumar Yadav, Maharashtra Vidhan Bhavan Felicitation: "तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
9
Belly Fat: 15 दिवसांत आत जाईल बाहेर आलेलं पोट! नॅच्युरोपॅथी तज्ज्ञांनी सांगितला 'रामबाण' घरगुती उपाय
10
“विधान परिषद निवडणुकीत आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, शंखनाद सभा घेणार”: नाना पटोले
11
CM शिंदेंच्या नातवाशी रंगला रोहित शर्माचा लडिवाळ संवाद... पाहा आजच्या कार्यक्रमाचे Photos
12
या पेनी स्टॉकवर LIC सह अनेक बँका 'फिदा'; 17 दिवसांत दुप्पट केला पैसा! किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी
13
लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी
14
टीम इंडियाला महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
"ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 
16
Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना
17
कॅच हातात बसला, आपण आणखी एक वर्ल्डकप जिंकू; सूर्याचे विधानसभेला मराठीतून आश्वासन
18
मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर प्रकाश आंबेडकरांची वसंत मोरेंवर टीका; म्हणाले तीन विषयांवर चर्चा...
19
“ओबीसी एकत्र आहोत, मनोज जरांगेंच्या पाडापाडीला आमच्या शुभेच्छा”; लक्ष्मण हाकेंचा पलटवार
20
'मुंबईकर' वर्ल्ड चॅम्पियन्स मुख्यमंत्र्यांच्या भेटीला! रोहित, सूर्या, दुबे, यशस्वी यांचा 'वर्षा'वर सत्कार

मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती, काँग्रेसलाही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 3:32 PM

Narendra Modi Speech in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. यादरम्यान संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला. तसेच मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली. मणिपूरमध्ये आता हिंसाचार कमी होत आहे. तसेच शांतता प्रस्थापित होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी राजकारण करू नये. जे लोक मणिपूरच्या विषयावरून आगीत तेल ओतत आहेत. त्यांना मणिपूर एक दिवस नाकारेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात मणिपूरमध्ये लावण्यात आलेल्या राष्ट्रपती शासनाची माहितीही दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेमध्ये संबोधित करताना म्हणाले की, मणिपूरबाबत मागच्या अधिवेशनात मी सविस्तर बोललो होतो. त्यावेळी उल्लेख केलेल्या बाबींची मी आज पुनरावृत्ती करू इच्छितो. मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तिथे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्याबाबत ११ हजारांहून अधिक एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत. मणिपूर हे एक लहान राज्य आहे. ५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे शांततेवर विश्वास ठेवणं शक्य होत आहे. आज मणिपूरमधील बहुतांश भागात सामान्यपणे शाळा सुरू आहेत. कॉलेज सुरू आहेत. तसेच कार्यालये आणि उद्योग संस्थाही सुरू आहेत.

यावेळी काँग्रेसच्या सत्ताकाळात मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि राष्ट्रपती राजवटीची आठवणही करून दिली. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या लोकांनी हे विसरू नये की, याच कारणामुळे मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लावावी लागली होती. तरीही राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९९३ मध्ये अशाच घटना घडल्या होत्या. त्यानंतर जवळपास ५ वर्षे ही अशांततेची मालिका सुरू होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीManipur Violenceमणिपूर हिंसाचार