शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"पंतप्रधान मोदी बोलताहेत चीनची भाषा" गंभीर आरोप करत काँग्रेसने डागले पाच सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 21:51 IST

लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले होतेअनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. त्यात भारताच्या भूभागावर झालेली चिनी घुसखोरी यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरणही तापले आहे. लडाखमधील घटनाक्रमावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात कमालीचे आक्रमक होत काँग्रेसने पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परवाच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मोदी हे चीनची भाषा बोलत आहेत, असा आरोप केला आहे. 

सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारताच्या सीमेत कुणी घुसलेले नाही. तसेच आमच्या कुठल्याही चौकीवर कुणाचा कब्जा नाही, असे सांगितले. हीच भाषा चीनही बोलत आहे आम्ही भारताच्या कुठल्याही भागात घुसखोरी केली नसल्याचे सांगत आहे, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. 

अनेक संरक्षण तज्ज्ञ, लष्करातील माजी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंवरून चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली आहे, हे स्पष्ट होत आहे. यादरम्यान, देशाच्या भूमीचे रक्षण करताना कर्नल संतोष बाबूंसह २० जवान धारातीर्थी पडले. तर ८५ जण जखमी झाले. याशिवाय १० जवानांना चीनने पकडले होते. आता मोदी सांगत आहेत की चिनी सैनिकांनी घुसखोरी केलेली नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. 

यावेळी कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पाच सवालही डागले. ते पुढीलप्रमाणे

१) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य म्हणजे गलवान खोऱ्यातून चीनला हाकलवण्यासाठी गेलेल्या कर्नल संतोष बाबू आणि अन्य १९ जवानांच्या वीरतेचा आणि बलिदानाचा अवमान नव्हे काय?

२) चीनने गलवान खोऱ्यावर कधी दावा केला नव्हता? चीन आता गलवान खोऱ्यात घुसखोरी केली आहे, असं म्हणणं चुकीचं आहे? 

३) संरक्षण तज्ज्ञ, लष्करी अधिकारी आणि सँटेलाईट फोटोंच्या माध्यमातून चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट होत आहे. मग सरकार ही बाब का नाकारत आहे. 

४) सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींनी आमच्या भूभागावर कुणीही घुसखोरी केली नसल्याचे सांगितले. मात्र नंतर पीएमओने आपल्या अधिकृत वक्तव्यातून हे विधान का हटवले. जर आमच्या क्षेत्रात कुणी घुसखोरी केली नसेल तर आमचे २० जवान कसे शहीद झाले? 

५) गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या बांधकामाबाबत संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केलेले दावे पंतप्रधान मोदी का खोडून काढत आहेत? 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कर्नल धारातीर्थी पडताच बिहार रेजिमेंटचे जवान भडकले, १८ जणांच्या माना मोडत चिन्यांना झोडपले

भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण.... 

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतchinaचीनcongressकाँग्रेसPoliticsराजकारण