शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"पंतप्रधान मोदींनी 2002 मध्ये धडा शिकवला होता..."; अमित शाह यांनी करून दिली गुजरात दंगलीची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 20:03 IST

शाह म्हणाले, “2002 मध्ये, दंगली झाल्या आणि त्यानंतर, मोदी साहेबांनी असे पुन्हा होऊ नये, यासाठी धडाही शिकवला. त्यानंतर दंगली झाल्या का? 2002 मध्ये दंगेखोरांना असा धडा शिकवला की, आजपर्यंत गुजरातमध्ये पुन्हा दंगे करण्याची कुणाची हिंमत झाली नाही."

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 2002 मध्ये मुख्यमंत्री असताना गुजरातमधील दंगेखोरांना असा धडा शिकवला की, आजपर्यंत पुन्हा राज्यात दंगल करण्याची कुणी हिंमत केली नाही. असे शाह यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी कलम 370 क्षणात रद्द करण्याचे आणि प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे श्रेयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. ते शनिवारी गुजरातमधील साणंद येथे विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान जनतेला संबोधित करत होते.

शाह म्हणाले, “2002 मध्ये, दंगली झाल्या आणि त्यानंतर, मोदी साहेबांनी असे पुन्हा होऊ नये, यासाठी धडाही शिकवला. त्यानंतर दंगली झाल्या का? 2002 मध्ये दंगेखोरांना असा धडा शिकवला की, आजपर्यंत गुजरातमध्ये पुन्हा दंगे करण्याची कुणाची हिंमत झाली नाही." यावेळी त्यांनी "गुलामगिरीची मानसिकता मुळासकट नष्ट करण्यासोबतच भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्याचा संकल्पही घेतला. 

पाकिस्तानला धडा शिकवणे, अयोध्येत श्री राम मंदिर, याच वर्षात चंद्रावर चंद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि कलम 370 हटविणे, आदींसंदर्भात पंतप्रदान मोदींचे कौतुक करत शाह म्हणाले, "पूर्वी आपल्याकडे रोज बॉम्ब ब्लास्ट होत होते. प्रिंट मीडियाचे पत्रकार छापायचेही विसरून जात, एवढे स्फोट होत होते. ज्यांना अंत नव्हता. मात्र, आम्ही एकदा सर्जिकल आणि एअर स्ट्राइक करून पाकिस्तानला धडा शिकवला. नरेंद्र भाईंनी देश सुरक्षित केला."

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शाह म्हणाले, “मोदी साहेबांनी सरदार पटेल आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचे स्वप्न एका झटक्यात पूर्ण केले. प्रभू श्री राम 500 वर्षांपासून तंबूत होते. मंदिर बांधता आले नाही. नरेंद्रभाईंनी मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले. संपूर्ण जग चंद्रावर पोहोचले पण आपला ध्वज पोहोचू शकला नव्हता. नरेंद्रभाईंनी चांद्रयान चंद्रावर पाठवले आणि शिवशक्ती पॉईंटवर आपला तिरंगा फडकवला. एवढेच नाही, तर नरेंद्र मोदी यांनी असे काम केले आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व पॅरामीटर्स गेल्या 75 वर्षातील सर्वोत्तम पातळीवर आहेत. 10 वर्षांचा विचार करता, नरेंद्रभाईंच्या कार्यकाळात सर्वाधिक औद्योगिक विकास झाला आहे," असेही शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहGujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा