शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

BJP Foundation Day: “घराणेशाही असलेल्या पक्षांनी देशाशी विश्वासघात केला”; PM मोदींची विरोधकांवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 12:01 PM

BJP Foundation Day: सध्या देशात विशिष्ट घराण्याची भक्ती आणि देशभक्ती असे दोन प्रकारचे राजकारण सुरु असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

नवी दिल्ली: आताच्या घडीला भारतीय जनता पक्ष (BJP) देशातील सर्वांत मोठा पक्ष ठरत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून, पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. जगभरात एवढे कार्यकर्ते असणारा भाजप मोठा पक्ष असल्याचे सांगितले जात आहे. यातच भाजप आपला ४२ वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर घणाघाती टीका करत घराणेशाहीच्या पक्षांनी देशाशी विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. 

सध्या देशात दोन प्रकारचे राजकारण सुरू आहे. एक म्हणजे एका विशिष्ट घराण्याची भक्ती आणि दुसरे म्हणजे देशभक्ती. देशातील काही पक्ष केवळ आपल्या कुटुंबासाठी काम करत आहेत. भाजपनेच प्रथम घराणेशाहीविरोधात बोलण्यास सुरुवात केली आणि हा निवडणुकीचा मुद्दा ठरला. घराणेशाहीचे सरकार लोकशाहीचे शत्रू असून, ते संविधानाला महत्त्व देत नाही, ही बाब आता देशवासीयांच्या लक्षात आली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

भाजपने देशवासींयांचे नुकसान थांबवले

घराणेशाहीच्या पक्षांना भाजपने जोरदार टक्कर दिली आणि देशवासीयांचे नुकसान होऊ दिले नाही, असे सांगत भाजपचा हा स्थापना दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारत स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण करत अमृत महोत्सव साजरा करत आहे. जगात मोठ्या घडामोडी घडत असून, भारतासाठी अनेकविध संधी उपलब्ध होत आहेत. याशिवाय अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये चार राज्यांत भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापन करून नवीन इतिहास घडवला आहे. तसेच तीन दशकांनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या १०० वर गेली आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. 

दरम्यान, भाजप कार्यकर्ते देशवासीयांच्या स्वप्नांचे प्रतिनिधी आहेत. भाजप कार्यकर्त्यांसाठी हा कर्तव्याचा काळ आहे. देश बदलतो आहे. देशाकडे आता निर्णयशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही आहेत. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमापर्यंत एक भारत, श्रेष्ठ भारतचा नारा भाजप आणखी सशक्त करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. चैत्री नवरात्राच्या शुभेच्छाही यावेळी पंतप्रधान मोदींनी दिल्या. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी