शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
2
"पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
3
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
4
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
5
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतली विशेष काळजी; जवळच्या लोकांना भेटायला न येण्याचे केले आवाहन
6
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
7
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
8
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
9
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
10
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
11
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
12
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
13
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
14
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र
15
किम जोंग-उनच्या बहिणीची दक्षिण कोरियाला धमकी; म्हणाल्या, "परिणाम गंभीर होतील..."
16
झिशान सिद्दिकींनाही संपवायचे होते, एक फोन आला आणि ते आत गेले...; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट
17
Baba Siddique : 'गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा', बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
18
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
19
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
20
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"

पंतप्रधान म्हणाले, ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिद्दीनच्या नावातही ‘इंडिया’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 5:08 AM

हल्लाबोल : देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल नको

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विरोधी आघाडी ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स’ (इंडिया) ही देशाने पाहिलेली सर्वांत दिशाहीन आघाडी असल्याचे टीकास्त्र सोडले. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ आणि ‘इंडियन मुजाहिद्दीन’ यांसारख्या नावांचा उल्लेख करून ते म्हणाले की, या नावांतही ‘इंडिया’ आहे.  केवळ देशाच्या नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल केली जाऊ शकत नाही, असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ही टीका केली. बैठकीत उपस्थित असलेल्या सूत्रांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपलाच विजय होणार असून, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळणे निश्चित आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तर मणिपूरसारख्या संवेदनशील विषयावर चर्चेसाठी सभागृहात योग्य वातावरण निर्माण केले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

काँग्रेसचा पलटवार

 पंतप्रधान विरोधकांना विरोध करताना ‘इंडिया’ शब्दाचा द्वेष करू लागले आहेत, असा आरोप काँग्रेसने मंगळवारी केला. 

 पक्षाच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी ट्वीट केले की, ‘तुम्ही काँग्रेसविरोधी इतके आंधळे झाले आहात की, तुम्ही ‘इंडिया’चा द्वेष करू लागला आहात.  

 आज निराश होऊन तुम्ही इंडियावरच हल्ला केल्याचे मी ऐकले आहे.’

‘ते’ हताश, निराश...

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, पंतप्रधानांनी विरोधकांच्या हताश आणि निराश वागणुकीवर बोट ठेवले. विरोधी पक्षांची वृत्ती हे दर्शवते की, त्यांनी आगामी अनेक वर्षे विरोधी पक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

विरोधक बेजबाबदार पंतप्रधान मोदी म्हणाले की,  मुख्य विरोधी पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचेही नाव ए. ओ. ह्यूम या इंग्रजाने ठेवले होते. लोक आता परिपक्व झाले आहेत आणि अशा नामकरणाने दिशाभूल होणार नाही. भाजपनेे विरोधी पक्षांवर संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा आरोप केला. त्याबद्दल मोदी म्हणाले की, विरोधक आता अधिकच बेजबाबदार झाले आहेत. सत्ताधारी पक्षाने अधिक जबाबदारीने वागणे अत्यावश्यक झाले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस