शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे वेधले पंतप्रधानांचे लक्ष

By admin | Published: May 05, 2017 1:31 AM

देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे

सुरेश भटेवरा /नवी दिल्लीदेशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या तसेच महाराष्ट्रात सक्त वसुली संचलनालयातर्फे घातल्या जाणाऱ्या धाडींमधे घडलेल्या गैरप्रकारांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. सुमारे अर्धातास चाललेल्या या भेटीत पवारांनी मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी, सिंचनाच्या सोयी, शेतमालाच्या हमी भावात वाढ, शेतीसाठी स्वस्त दरात कर्ज आदी उपाययोजनांचा आग्रह धरला. या महत्वपूर्ण भेटीत मोदींना उद्देशून पवार म्हणाले, देशातला शेतकरी वर्ग संकटात आहे. वर्षभरात जवळपास १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी ४२९१ शेतकरी महाराष्ट्रातले आहेत. कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातही परिस्थिती गंभीरच आहे. केंद्र सरकारने या संदर्भात तातडीची उपाययोजना केली नाही तर हा प्रश्न स्फोटक बनेल. पवार पंतप्रधानांना म्हणाले, युपीए सरकार सत्तेवर असतांना देशातल्या शेतकऱ्यांचे ७0 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. याखेरीज अन्य उपायांचीही अमलबजावणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले होते. उत्तरप्रदेशात भाजपने अलीकडेच शेतकऱ्यांच्या कर्ज माफीची घोषणा केली. साहजिकच देशभर संकटात असलेल्या शेतकरी वर्गाला आता उत्तरप्रदेशच्या धर्तीवर कर्जमाफी हवी आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातल्या तूर खरेदीच्या समस्येकडेही पंतप्रधानांचे लक्ष वेधले. पवारांच्या साऱ्या सुचना शांतपणे ऐकल्यावर पंतप्रधान म्हणाले, केंद्र विविध उपाययोजनांवर लक्ष केंद्र्रीत करीतच आहे. तथापि या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पवारांनी स्वत: पुढाकार घेतल्यास सरकारला मदत होईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही पवारांनी मार्गदर्शन करावे, महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करायला केंद्र सरकार तयार आहे, असे आश्वासनही पंतप्रधानांनी पवारांना दिले.ईडीच्या धाडींतील गैरप्रकारांची तक्रारमुंबई व महाराष्ट्रात सध्या सक्त वसुली संचलनालयाचे (ईडी) धाडसत्र सुरू आहे. करबुडव्यांवर धाडी घालण्याची कारवाई कायदेशीर असली तरी या धाडी दरम्यान धाकदपटशाचा मार्ग अवलंबून अधिकाऱ्यांतर्फे संबंधितांना लुबाडण्याच्या गंभीर घटना घडत असल्याचे कानावर येत आहे, अशी गंभीर तक्रार नोंदवीत पवार पंतप्रधानांना म्हणाले, सक्त वसुली संचलनालयातर्फे महाराष्ट्रात यापूर्वी असा अतिरेक कधी घडलेला नाही. त्यावर पंतप्रधान म्हणाले, अशाच काही तक्रारी माझ्याही कानावर आल्या आहेत. काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित विभागातर्फे देण्यात आले आहेत.