शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"ड्रायव्हर्स हे आपल्या अर्थव्यवस्थेची आणि प्रगतीची चाकं, ते अत्यंत कमी वेतनावर खडतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:37 IST

Priyanka Gandhi : केंद्र सरकार जनतेला त्रास देणारे कायदे करत असल्याचा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या नवीन हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रकचालकांच्या आंदोलनाला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा पाठिंबा मिळाला आहे. याच दरम्यान त्यांनी यावरून केंद्रावरही जोरदार निशाणा साधला आहे. बुधवारी (3 जानेवारी) त्यांनी पुन्हा एकदा आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत ट्विट केलं आहे. तसेच केंद्राला ड्रायव्हर्सच्या सुविधांची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. 

प्रियंका गांधी यांनी मंगळवारीही अशीच पोस्ट करत ट्रक चालकांच्या संपाबाबत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. केंद्र सरकार जनतेला त्रास देणारे कायदे करत असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. "ड्रायव्हर्स हे आपल्या अर्थव्यवस्थेची आणि प्रगतीची चाकं आहेत. ते अत्यंत कमी वेतनावर खडतर जीवनशैली जगतात, विविध अडचणींना तोंड देतात. कायदा आणि व्यवस्था त्यांच्याप्रती मानवीय असली पाहिजे."

"प्रत्येक जीव अनमोल आहे. प्रत्येकाचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. कायद्याचा उद्देश सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य, सुरक्षित आणि न्याय मिळवून देणे आणि लाखो लोकांना यातना न देणे हा आहे. सल्लामसलत न करता आणि विरोधकांना सहभागी न करता एकतर्फी तुघलकी कायदे बनवण्याचे काम थांबवले पाहिजे" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

केंद्र सरकारने 'हिट अँड रन' (Hit And Run) कायद्यात केलेल्या (Motor Vehicles Act) बदलांविरोधात देशभरात ट्रक चालकांनी संप पुकारला होता. या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून देशभरातील लोकांचे हाल झाले. याबाबत केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासमवेत गृह मंत्रालयात राष्ट्रीय परिवहन संघटनेची बैठक झाली. यावेळी सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर संघटनेने संप मागे घेण्याचे मान्य केले आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस