शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 1:36 PM

Lok Sabha Election 2024 And Jairam Ramesh : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र पक्षाने रणनीती बदलून नवे चेहरे उभे करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली.

काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यावेळी रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर अमेठीच्या जागेवर पक्षाने किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. किशोरीलाल हे सोनिया गांधी यांच्या जवळच्या मानले जातात. ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधींनी यापूर्वी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 

राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा यापूर्वी होती. मात्र, पक्षाने अचानक रणनीती बदलून दोन्ही जागांवर नवे चेहरे उभे करण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयराम रमेश म्हणाले की, "राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या वृत्तावर अनेकांची मतं आहेत. पण ते राजकारण आणि बुद्धिबळातील अनुभवी खेळाडू आहेत आणि आपली वाटचाल विचारपूर्वक करतात."

"पक्षनेतृत्वाने बरंच विचारमंथन केल्यानंतर आणि मोठ्या रणनीतीचा भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने भाजपा, त्यांचे समर्थक कोलमडले आहेत. गांधी घराण्याच्या बालेकिल्ल्याचा विचार केला तर, केवळ अमेठी-रायबरेलीच नाही तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत संपूर्ण देश गांधी घराण्याचा गड आहे. राहुल गांधी उत्तर प्रदेशातून तीनदा आणि केरळमधून एकदा खासदार झाले, पण निवडणूक लढवण्याची हिंमत मोदीजी का दाखवू शकले नाहीत? आणखी एक गोष्ट स्पष्ट आहे की, काँग्रेस परिवार हे लाखो कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षांचे कुटुंब आहे."

"काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा मोठ्या नेत्यांपेक्षा जास्त ताकदवान आहे. काल एक प्रख्यात पत्रकार अमेठीतील एका कार्यकर्त्याला उपहासाने विचारत होता की, तिकीट काढण्याची तुमचा नंबर कधी येईल? हे घ्या... आला आहे. एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता अमेठीत भाजपाचा भ्रम आणि अहंकार दोन्ही तोडेल. प्रियंकाजी जोरदार प्रचार करत आहेत आणि त्या एकट्या नरेंद्र मोदींना त्यांच्या प्रत्येक खोट्याला सत्याने उत्तर देऊन गप्प करत आहेत, म्हणूनच त्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहणे आवश्यक होते."

"प्रियंकाजी कोणतीही पोटनिवडणूक लढवून सभागृहात पोहोचतील. आज स्मृती इराणी यांची एकमेव ओळख आहे ती म्हणजे त्या अमेठीतून राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवतात. आता ती प्रसिद्धीही स्मृती इराणींकडून हिरावून घेतली गेली. आता व्यर्थ विधानं करण्यापेक्षा स्मृती इराणींनी स्थानिक विकासाबाबत उत्तर द्यावे, बंद पडलेली रुग्णालये, स्टील प्लांट आणि आयआयआयटी यांच्यावर उत्तर द्यावं. बुद्धिबळातील काही चाली बाकी आहेत, थोडी वाट पाहा" असं देखील जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधीRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण