शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

जिल्ह्यातील वाळू गटांवरील उचल बंद आठ दिवसाची प्रक्रिया : जिल्हा प्रशासन करणार संपूर्ण मोजमाप

By admin | Published: April 05, 2016 10:02 PM

जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आलेल्या वाळू गटांच्या मोजणीला प्रारंभ होणार असल्याने आठ दिवस वाळू गटांवरून उचल बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी सांगितले.

जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे लिलाव करण्यात आलेल्या वाळू गटांच्या मोजणीला प्रारंभ होणार असल्याने आठ दिवस वाळू गटांवरून उचल बंद करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासानातर्फे गिरणा, तापी यासह विविध नदी पात्रातील ४४ वाळू गटांमधून गटनिहाय वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. सुरुवातीला १६ वाळू गटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला १५ कोटी ८९ लाख ४६ हजार ५०६ रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यानंतर तीन वेळा लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याला फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. या दरम्यान काही वाळू ठेकेदारांनी रक्कम न भरल्याने जिल्हाभरात १२ वाळू गटांवरील उचल सुरु होती. स्मॅट प्रणालीचा अवलंब केल्याशिवाय वाळू उचल करू देऊ नये या आशयाची याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात टाकण्यात आल्याने काही दिवस वाळू उचल करण्यास स्थगिती देण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनातर्फे स्मॅट प्रणालीचा अवलंब सुरु केल्यानंतर वाळू उचल करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. या काळात ठेकेदारांनी किती वाळूची उचल केली याची मोजणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आठ दिवस वाळू ठेक्यांवरील उचल बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. या कालावधीत संबधित तालुक्याचे तहसीलदार हे वाळू गटांची मोजणी करणार आहेत. त्याचा अहवाल तीन ते चार दिवसात अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.

इन्फो-
बारकोड सिस्टीम सुरु होणार
वाळूची उचल करण्यासाठी बारकोड सिस्टीमचा अवलंब करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून ही सिस्टीम लागू करण्याबाबत नियोजन होते. मात्र वाळू गटांच्या मोजणीनंतर ही सिस्टीम लागू करण्यात येणार असल्याचे गुलाबराव खरात यांनी सांगितले. पुणे येथील शौर्य इन्फोटेक यांना बारकोड सिस्टीमचे काम देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.