शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आदित्य ठाकरेंनी म्हटलं कैसे हो! तेजस्वी यादवांनी केले स्वागत; बिहार दौऱ्यात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 17:21 IST

बिहारमध्ये प्रगती होताना दिसतेय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई - युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंसोबतशिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हेदेखील उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामुळे आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे बिहारला पोहचताच पटना येथे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी पोहचले. तेव्हा आदित्य यांच्या स्वागतासाठी तेजस्वी यादव स्वत: बाहेर उभे होते. 

आदित्य ठाकरेंची गाडी पोहचल्यानंतर हे दोन्ही नेते आमनेसामने आले. तेव्हा आदित्य यांनी कैसे हो असा प्रश्न तेजस्वी यादवांना केला. तेव्हा तेजस्वी यादव यांनी Very Well, Welcome म्हणत त्यांना घरात घेऊन गेले. त्याठिकाणी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पहिल्यांदाच तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे भेटणार त्यामुळे याठिकाणी माध्यमांचीही बरीच गर्दी होती. 

या बैठकीनंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलले की, आम्ही एकमेकांशी फोनवरून संपर्कात होतो. कोविड असल्याने आमची भेट झाली नाही. बिहारमध्ये प्रगती होताना दिसतेय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे. बोलणं व्हायचं पण आज भेट झाली. वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. पर्यावरण, विकासाच्या कामावर चर्चा झाली असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राजकीय चर्चा झाली नाही. परंतु देशातील महागाई, रोजगार याविरोधात तरुणांनी एकटवलं पाहिजे. सर्वांनी एकत्र काम केले तर देशात काहीतरी चांगले घडेल. भेट होणं महत्त्वाचं होतं. आमचे कौटुंबिक संबंध होते. ही मैत्री यापुढेही कायम राहील. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आता येणे-जाणं होत राहील. तेजस्वी यादव यांना मुंबई भेटीचं निमंत्रण दिले आहे. तेजस्वी यादव लंबी रेस के घोडे आहे असं कौतुक आदित्य ठाकरेंनी केले. 

देशात तरुण नेत्यांची मजबूत फळी उभारणारतेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांच्या मदतीनं राजकीय परिवर्तन केलंय. अशा तरूण नेत्यांना भेटून देशात मजबूत फळी उभारण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करतायेत. त्यात त्यांना यश मिळतंय. देशातील प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधायचा आहे. अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी इतर राज्यातील प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरे भेटणार आहे. या देशात समर्थ पर्याय उभं करण्याच्या दृष्टीने ही राष्ट्रीय रणनीती आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेTejashwi Yadavतेजस्वी यादवShiv Senaशिवसेना