शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

महाराष्ट्रातील दोन अधिकाऱ्यांसह १६ आयएएस अधिकाऱ्यांना पदाेन्नती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 6:02 AM

महाराष्ट्र केडरच्या १९९८ च्या बॅचचे दोन आयएएस अधिकारी राजीव कुमार मित्तल आणि सौरभ विजय यांना केंद्रात अतिरिक्त सचिव पदावर बढती देण्यात आली आहे

मनोज टिबडेवाल आकाश

नवी दिल्ली - भारत सरकारच्या नियुक्ती प्रकरणातील समितीने देशातील १६ आयएएस अधिकाऱ्यांची केंद्रामध्ये अतिरिक्त सचिव आणि अतिरिक्त सचिवांच्या समकक्ष पदांसाठी बढती केली आहे हे सर्व अधिकारी सहसचिव दर्जाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होते, आता त्यांना बढती देऊन अतिरिक्त सचिव करण्यात आले आहे. यातील प्रत्येकी एक आयएएस १९८७, १९९६ व १९९७ बॅचमधील तर उर्वरित १३ अधिकारी १९९८ च्या बॅचमधील आहेत.

महाराष्ट्र केडरच्या १९९८ च्या बॅचचे दोन आयएएस अधिकारी राजीव कुमार मित्तल आणि सौरभ विजय यांना केंद्रात अतिरिक्त सचिव पदावर बढती देण्यात आली आहे. १९८७ च्या बॅचमधील पश्चिम बंगाल केडरचे आयएएस आणि सध्या उपराष्ट्रपती धनखड यांचे सचिव सुनील कुमार गुप्ता यांची पदोन्नती दीर्घकाळापासून प्रलंबित होती. त्यांची सेवानिवृत्ती या वर्षी ३१ डिसेंबर रोजी आहे. आता त्यांची अतिरिक्त सचिवांच्या समकक्ष पदासाठी बढती देण्यात आली आहे.

यांनाही मिळाली बढती : १९९६ बॅचच्या यूपी केडरच्या अनिता मेश्राम आणि १९९७ बॅचच्या तामिळनाडू केडरचे पंकजकुमार बन्सल यांनाही बढती मिळाली आहे. याशिवाय १९९८ च्या बॅचचे ज्ञानेंद्र डी त्रिपाठी, श्रीकांत नागुलापल्ली, रित्विक रंजनाम पांडेय, निकुंज कुमार श्रीवास्तव, विशाल चौहान, आनंदराव विष्णू पाटील, पुनीत अग्रवाल, ज्ञानेश भारती, संतोष दत्तात्रेय वैद्य, वंदना यादव यांना अतिरिक्त सचिवपदी बढती करण्यात आली आहे. विशाल गगन यांना अतिरिक्त सचिवांच्या समकक्ष पदावर बढती देण्यात आली आहे.