शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एस. जयशंकर यांनी मनं जिंकली; परराष्ट्र मंत्रिपद स्वीकारताच विनम्र ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 16:36 IST

गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या नेत्या अशी स्वराज यांची प्रतिमा आहे.

ठळक मुद्देजयशंकर यांनी पदाची सूत्रं स्वीकारताच सुषमा स्वराज यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.मोदी सरकार-२ मध्येही परराष्ट्र खातं सुषमा स्वराज यांनाच दिलं जाईल, असा बहुतेकांचा कयास होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मंत्रिमंडळ निवडताना दिलेल्या काही धक्क्यांपैकी एक आश्चर्याचा धक्का म्हणजे, माजी परराष्ट्र सचिव डॉ. एस. जयशंकर यांना देण्यात आलेलं परराष्ट्र मंत्रिपद. 'मोदी सरकार-१' मध्ये हे मंत्रालय सुषमा स्वराज यांच्याकडे होतं आणि त्यांनी आपल्या कार्यकुशलतेनं त्यावर आपली छाप सोडली आहे. गरजूंच्या मदतीला धावणाऱ्या आणि पाकिस्तानला खडे बोल सुनावणाऱ्या नेत्या अशी स्वराज यांची प्रतिमा आहे. त्यांची ही लोकप्रियता ओळखून, जयशंकर यांनी पदाची सूत्रं स्वीकारताच त्यांच्याबद्दल विनम्र भावना व्यक्त केल्यात. 

'माझं पहिलं ट्विट. आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभार. ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आल्यानं सन्मानित झाल्यासारखं वाटतंय. सुषमा स्वराज यांच्या पाऊलखुणांवरून चालणं खूप अभिमानास्पद आहे', असं एस जयशंकर यांनी म्हटलंय. 

वास्तविक, मोदी सरकार-२ मध्येही परराष्ट्र खातं सुषमा स्वराज यांनाच दिलं जाईल, असा बहुतेकांचा कयास होता. प्रकृतीच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नसल्याचं स्वराज यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. परंतु, त्यांना राज्यसभा सदस्यत्व देऊन मंत्री केलं जाईल, असं वाटत होतं. परंतु, शपथविधीच्या दिवशी सुषमा स्वराज स्टेजसमोर बसल्या आणि अनेकांचा हिरमोड झाला. सोशल मीडियावरून नाराजीही व्यक्त झाली. परंतु आता, स्वराज यांच्या चाहत्यांची मनं एस. जयशंकर यांनी जिंकली आहेत.  

एस. जयशंकर यांना परराष्ट्र व्यवहारातील प्रत्यक्ष डावपेचांची चांगली माहिती आहे. रशिया, वॉशिंग्टन, बिजींग अशा सध्याच्या जगातील महत्वाच्या शक्तीकेंद्रांवर त्यांनी काम केले आहे. अन्य अनेक देशांतील त्यांची कामगिरी वाखाणली गेली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून जयशंकर यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. अमेरिकेने मोदींचा व्हिसा रद्द केला. पंतप्रधान झाल्यावर मोदींना तो पुन्हा मिळाला. मोदींचा पहिला अमेरिकन दौरा बराच गाजला. तो यशस्वी करण्यात जयशंकर यांचा वाटा महत्त्वाचा होता. भारताच्या अणुकार्यक्रमातही त्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांशी त्यांचा थेट संबंध आहे. हे गुण हेरूनच मोदींनी परराष्ट्र मंत्री म्हणून एस. जयशंकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. जयशंकर यांचे वडील सुब्रमण्यम हे नावाजलेले सामरिक सल्लागार होते. 

टॅग्स :PM Narendra Modi Cabinetनरेंद्र मोदी मंत्रिमंडळSushma Swarajसुषमा स्वराजNarendra Modiनरेंद्र मोदी