शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
2
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
3
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
4
"काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता..."; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला
5
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा
6
रत्नागिरीकरांना बदल हवाय, विद्यमान आमदार नको' उदय सामंतांबाबत भाजप नेत्याचा दावा
7
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
8
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान
9
संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
10
प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न
11
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
12
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली
13
पहिल्या यादीत नाव नाही, पक्षाला रामराम ठोकत भाजपाचा हा नेता थेट जरांगेंच्या भेटीला
14
तोंडावर मास्क अन् गुंडांना लोळवणारा पोलीस! KGF च्या मेकर्सचा नवा सिनेमा 'बघिरा', उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज
15
उघडताच १००% सबस्क्राइब झाला IPO, किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या; किती आहे GMP?
16
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
17
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
18
Vastu Shastra: 'या' टिप्स फॉलो केल्या तर दिवाळीतच काय, वर्षभर चमकेल तुमची वास्तु!
19
चंद्राबाबूंनी जोडप्यांना दिला अधिकाधिक मुलं जन्माला घालण्याचा सल्ला, नवीन कायदाही आणणार, नेमकं कारण काय?
20
Ola नं सर्व्हिस सेंटरवर उभे केले बाउन्सर्स? कुणाल कामरानं पुन्हा भाविश अग्रवालांवर यांच्यावर साधला निशाणा

सरकारमुळे जनता आर्थिक संकटात

By admin | Published: November 13, 2016 3:27 AM

नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत घाईघाईत आणि कोणतेही नियोजन न करता हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्रास संपूर्ण देशाला सहन

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत घाईघाईत आणि कोणतेही नियोजन न करता हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्रास संपूर्ण देशाला सहन करावा लागत आहे. सामान्य लोक आर्थिक संकटात सापडले आहेत.हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने गांभीर्याने विचार केलाच नाही, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी शनिवारी केली. ते म्हणाले की, अत्यंत घाईघाईत नोटा बंद करण्यात आल्या. आता काळा पैसा अन्य स्वरूपात रूपांतरित केला जात आहे. नोटा बंदीचा निर्णय हा नरेंद्र मोदी यांचा आणखी एक ‘निवडणूक जुमला’ आहे. नोटांवर बंदी घातल्यानंतर देशात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. लोक पैशांअभावी त्रासले आहेत. अशा वेळी पंतप्रधानांनी देशात असायला हवे होते. मात्र ते जपानला निघून गेले आहेत. कपिल सिबल म्हणाले की, सरकारमुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. रोख रक्कम मिळण्यासाठी बँका आणि एटीएम केंद्रांबाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. खाते माझे आहे, पैसा माझा आहे, मग मी कित्येक तासन्तास रांगेत का उभे राहायचे? मात्र मोदी सरकारकडे या प्रश्नाचे उत्तर नाही. मी सामान्य माणूस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत करीत असतात. ते काही लोकांसारखे रांगेत उभे राहिलेले नाहीत. त्यांना तसे करण्याची वेळही येत नाही. खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची असते, हे त्यांना माहितीच नाही. पीठ, डाळी आणि साखर यांची किंमत काय आहे, हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे लोकांच्या हालाची या सरकारला कल्पनाच नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल सामान्य नागरिकांसोबत रांगेत उभे राहून एका बँकेतून नोटा बदलून घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कपिल सिबल यांची सरकारवरील टीका आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)