शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

Pulwama Attack: भारतमातेने गमावले काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे वीरपुत्र, महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 3:32 PM

दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना हौतात्म्य

नवी दिल्ली: दोन वर्षांपूर्वी उरीमध्ये झालेल्या हल्ल्याची जखम अद्याप भळभळती आहे. भारतीय नागरिक अद्याप हा हल्ला विसरलेले नाहीत. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला. मात्र त्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या कुरघोड्या सुरुच राहिल्या. काल काश्मीरमधील पुलवामात झालेल्या हल्ल्यानं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा जगासमोर आणला. पाकिस्तान माणुसकीची चिंता नाहीच, मात्र तो आंतरराष्ट्रीय नियमांनादेखील जुमानत नाही, हेच कालच्या हल्ल्यानं अधोरेखित केलं. उरीत भारताचे 19 जवान शहीद झाले. पुलवामातील हल्ला यापेक्षा भीषण ठरला. यामध्ये सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. उरी आणि पुलवामा या दोन हल्ल्यांदरम्यान पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच होतं. याशिवाय दहशतवाद्यांची घुसखोरी आणि त्यांच्याकडून होणारा गोळीबारदेखील थांबला नव्हता. भारतीय सैन्य या दुहेरी आव्हानांचा सामना करत असताना काल पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा हल्ला झाला. यात भारतभूमीचे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे सुपुत्र गमावले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली. काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाMartyrशहीदTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक