शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"आता एकच संदेश, शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या अन्..."; संयुक्त किसान मोर्चाचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 09:17 IST

Rakesh Tikait And Modi Government : योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजपाला शेतकरी विरोधी म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांनी मेरठमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. हन्नान मोल्ला, योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजपालाशेतकरी विरोधी म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकरी विरोधी भाजपा विरोधात मतदान करून त्यांना शिक्षा द्या, असं आवाहन केलं आहे. योगेंद्र यादव यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "क्रांतीचं ठिकाण असलेल्या मेरठमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाबाबत हन्नान मोल्ला आणि राकेश टिकैत यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधला. यात एकच संदेश आहे की शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या" असं म्हटलं आहे. 

राकेश टिकैत यांनी "पश्चिम उत्तर प्रदेशला विकासाची चर्चा करायची आहे. हिंदू, मुस्लीम, जिन्ना, धर्माच्या गोष्टी करणाऱ्यांना मतांचं नुकसान होईल. मुझफ्फरनगर हिंदू-मुस्लीम सामन्याचं मैदान (स्टेडियम) नाही, देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचं नावही घेत नाहीत. आजपर्यंत पंतप्रधानांनी आंदोलना दरम्यान जीव गेलेल्या शेतकऱ्यांना शहीद म्हणणं टाळलं आहे. त्यांच्या उमेदवारांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला हवेत" असं आवाहन टिकैत यांनी केलं आहे. 

"भाजपाने आपली आश्वासनं पाळली नाहीत"

संयुक्त किसान मोर्चाने याआधी 4 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशच्या नागरिकांना भाजपाला शिक्षा देण्याचं आवाहन केलं होतं. भाजपाने आपली आश्वासनं पाळली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी त्यांना शिक्षा द्यावी, असं म्हटलं होतं. शेतीमालाला हमीभावावर समिती स्थापन करणे आणि शेतकऱ्यांविरोधातील प्रकरणे मागे घेण्यासह अनेक मागण्या अपूर्ण असल्याचं शेतकरी नेत्यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीपासून मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी मतदान होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"कोरोनाच्या संकटात मोदींनी शेतकऱ्यांना वर्षभर रस्त्यावर सोडलं"

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटतं की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींवर कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना एक वर्षभर रस्त्यावर सोडल्याचा गंभीर आरोपही केला आणि काँग्रेस असं कधीच करणार नाही, असं देखील म्हणाले आहेत. तसेच मोदी सरकारने जशी वागणूक दिली तसा त्यांचा पक्ष शेतकर्‍यांशी कधीही वागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीBJPभाजपाrakesh tikaitराकेश टिकैतYogendra Yadavयोगेंद्र यादव